शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘रायन’चे सीईओ उच्च न्यायालयात, अटकपूर्व जामिनाची मागणी, शाळेत अल्पवयीन मुलाची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:55 IST

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.

मुंबई : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हरियाणा न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच अटक केली जाईल, या भीतीने शाळा समूहाचे विश्वस्त डॉ. आॅगस्टाईन फ्रॅन्सिस पिंटो (७३) व त्यांची पत्नी ग्रेस पिंटो (६२) यांनी ट्रान्झिट जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अजय गडकरी यांनी पिंटो कुटुंबीयांच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येमुळे गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पिंटो यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. संतापलेल्या पालकांनी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळील दारूच्या दुकानांची तोडफोड केली. तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बस कंडक्टरला अटक केली. तसेच रायन समूहाचे दोन वरिष्ठ अधिकारी फ्रान्सिस थॉमस व जेयस थॉमस यांना अटक केली. दरम्यान, हरियाणाचे शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा यांनी गुरुग्राम पोलिसांना प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी रायन ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाºयांवरही गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आॅगस्टाईन पिंटो आणि ग्रेस पिंटो यांनी उच्च न्यायालयात ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली. ‘१० सप्टेंबर रोजी विश्वस्तांना वर्तमानपत्राद्वारे हरियाणाच्या मंत्र्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल केलेल्या वक्तव्याची माहिती मिळाली,’ असे पिंटो यांनी याचिकेत म्हटले आहे.गुन्हा गुरुग्राममध्ये घडल्याने या दोन्ही विश्वस्तांना केवळ हरियाणा न्यायालयच अटकेपासून वाचचू शकते. मात्र हरियाणाला पोहोचण्यापूर्वीच पोलीस अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस कारवाई करण्याची शक्यता असल्याने हरियाणा न्यायालयात पोहोचेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. अद्याप विश्वस्तांनी प्रद्युम्नच्या हत्येबाबत कोणतेही अधिकृत निवेदन केले नसले तरी पिंटो यांनी याचिकेत प्रद्युम्नचा मृत्यू ‘दुर्दैवी’ असल्याचे म्हटले आहे. प्रद्युम्नच्या मृत्यूमुळे केवळ त्याच्या पालकांनाच दु:ख झाले नाही, तर त्याच्या मृत्यूचे दु:ख विश्वस्त, शाळेचे कर्मचारी, शाळा व्यवस्थापन आणि अन्य विद्यार्थ्यांनाही झाले आहे, असे पिंटो यांच्या याचिकेत म्हटले आहे. ‘संस्थेच्या ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व भल्यासाठी शाळा समूह आवश्यक ती सर्व पावले उचलेल. गुरुग्राम शाळेत सीसीटीव्ही लावल्यानेच मारेक-याला अटक करणे शक्य झाले,’ असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.कारभार शाळा व्यवस्थापन पाहातेएका कंडक्टरला विद्यार्थ्यांचे शौचालय वापरूच कसे दिले, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे वादही निर्माण झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना पिंटो यांनी याचिकेत म्हटले आहे की, ब-याचदा कंत्राटी कर्मचारीही विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या (शौचालय) सुविधांचा वापर करतात. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करून दिला जातो. ‘आम्ही मुंबईत राहतो आणि व्यवस्थापनाचा सर्व कारभार मुंबईतूनच पाहिला जातो. शाळेचा दैनंदिन कारभार शाळा व्यवस्थापनाने नियुक्त केलेले स्थानिक कर्मचारी पाहतात,’ असेही याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलMumbai High Courtमुंबई हायकोर्ट