शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ग्रामीण राजकारण ढवळून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 01:47 IST

राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये १ हजार ७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६३२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे.

मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये १ हजार ७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६३२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २३ जिल्ह्यांमधील ७ हजार १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १ हजार २१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक ४ आॅगस्टला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज ही माहिती दिली. या निवडणुकींच्या निमित्ताने राज्याचे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे. सत्तारूढ भाजपा-शिवसेनेची ग्रामीण भागात किती पकड आहे हे सिद्ध होईल. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्ता गेल्यानंतर होत असलेली ही पहिली मोठी निवडणूक असल्याने या दोन्ही पक्षांना नव्याने उभारी मिळते काय याबाबत उत्सुकता असेल. अनेक ठिकाणी ही निवडणूक पक्षीय चिन्हांवर लढली जात नसली तरी स्थानिक राजकारण पक्षापक्षांमध्ये विभागलेले असते. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागांत आज रात्री १२पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या पाच तालुक्यांत मात्र दुपारी ३ पर्यंत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक सुटी जाहीर करतील. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी २७ जुलै रोजी; तर दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी होईल. (विशेष प्रतिनिधी)