शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

ग्रामीण राजकारण ढवळून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 01:47 IST

राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये १ हजार ७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६३२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे.

मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये १ हजार ७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६३२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २३ जिल्ह्यांमधील ७ हजार १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १ हजार २१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक ४ आॅगस्टला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज ही माहिती दिली. या निवडणुकींच्या निमित्ताने राज्याचे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे. सत्तारूढ भाजपा-शिवसेनेची ग्रामीण भागात किती पकड आहे हे सिद्ध होईल. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्ता गेल्यानंतर होत असलेली ही पहिली मोठी निवडणूक असल्याने या दोन्ही पक्षांना नव्याने उभारी मिळते काय याबाबत उत्सुकता असेल. अनेक ठिकाणी ही निवडणूक पक्षीय चिन्हांवर लढली जात नसली तरी स्थानिक राजकारण पक्षापक्षांमध्ये विभागलेले असते. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागांत आज रात्री १२पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या पाच तालुक्यांत मात्र दुपारी ३ पर्यंत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक सुटी जाहीर करतील. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी २७ जुलै रोजी; तर दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी होईल. (विशेष प्रतिनिधी)