शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

लातुरात मुगाची आवक स्थिर, ४५० रुपयांनी भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:44 IST

बाजारगप्पा : मुगाची आवक स्थिर असली तरी या आठवड्यात दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे़ 

- हरी मोकाशे (लातूर)

लातूर उच्चतम  कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापासून घटलेली शेतमालाची आवक आता वाढत आहे़ पंधरा दिवसांपासून सुरू असलेली मुगाची आवक स्थिर असली तरी या आठवड्यात दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे़राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर बाजार समिती आहे़ येथील बाजारपेठेत चांगला दर मिळतो, असा शेतकऱ्यांना अनुभव आहे़ त्यामुळे लातूरसह, परजिल्ह्यातील तसेच शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील काही शेतमाल येथे विक्रीसाठी येतो़ पावसाने गुंगारा दिल्यामुळे मूग, उडदाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे़ सोयाबीची काढणीही सुरू झाली आहे़ दररोज ८ ते १० पोते नवीन सोयाबीनही विक्रीसाठी येऊ लागले आहेत़

मागील आठवड्यात मुगाला प्रति क्विंटल सर्वसाधारण दर ४ हजार ३९० रुपये मिळत होता़ या आठवड्यात तो ४ हजार ८५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ त्याचबरोबर उडदाची आवक जवळपास ६०० क्विंटलने वाढली. सर्वसाधारण दरात २०० रुपयांची वाढ होऊन तो ४ हजार २५० रुपयांवर स्थिरावला आहे़ गतवर्षीच्या सोयाबीनची बाजारपेठेत आवक वाढली आहे़; परंतु दीडशे रुपयांनी घट झाली आहे़ ३ हजार १५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ तुरीची आवक घटली असून, ती दररोज ५५० क्विं़पर्यंत होत आहे़ आवक घटली की दर वाढतो, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे़ रबीतील हरभऱ्याची दैनंदिन आवक दोन हजार क्विं़पर्यंत असून, दरात ४८० रुपयांनी वाढ झाली आहे़ सध्या ४ हजार ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ गव्हास सर्वसाधारण दर १९००, हायब्रीड ज्वारी १२५०, रबी ज्वारी १८००, पिवळी ज्वारी २३५०, करडई ३६०० आणि तिळास प्रति क्विं़ ८ हजार रुपये दर मिळत आहे़ 

दरम्यान, बाजारपेठेत नवीन शेतमालाच्या दरात वाढ होत असली तरीही केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मूग उत्पादकांना प्रति क्विंटल २ हजार १२५, उडदातून १ हजार ३५० रुपये कमी मिळत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाने आधारभूत किमतीनुसार हा शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात नाफेडचे पोर्टलच सुरू झाले नसल्याने आठवडा उलटला तरीही आॅनलाईन खरेदी सुरू झाली नाही.

नाफेडअंतर्गत खरेदीदार संस्थांची माहिती मिळविण्यातच नाफेड हैराण आहे. नोंदणीसाठी सध्या शेतकऱ्यांच्या हातात केवळ ३ ते ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नियोजित वेळेत आपल्या नावाची नोंदणी होईल काय? नोंद झाली तर मालाची खरेदी कधी होणार? पैसे हाती कधी पडणार? असे नानाविध सवाल शेतकऱ्यांच्या मनात घोळत आहेत. कारण दसरा, दिवाळी सण तोंडावर आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर लेकीबाळी माहेरी येतात, त्यांना कपडेलत्ते करणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे हवे आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र