शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

तीन महिन्यांत रुपयाचे १३ टक्क्यांनी झाले अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:07 IST

कापसाची पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव आहेत. म्हणजेच हमी किमतीपेक्षा थोडे जास्त आहेत. रुपयाच्या अवमूल्यनाचा हा फायदा आहे.

*विजय जावंधिया (शेतकरी नेते)*

कापूस, सोयाबीन, भुईमुगाची आवक सुरू होणार आहे. कापसाची पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव आहेत. म्हणजेच हमी किमतीपेक्षा थोडे जास्त आहेत. रुपयाच्या अवमूल्यनाचा हा फायदा आहे. या तीन महिन्यांत १३ टक्क्यांनी रुपयाचे अवमूल्यन झाले आहे.

जागतिक बाजारात डॉलरमध्ये कापसाच्या भावात फक्त ५ ते १० टक्केच वाढ आहे. ७५ सेंट प्रति पाऊंड त-हेचे हमीभाव ८५ सेंट प्रति पाऊंडपर्यंत आहेत. भारतात सरकीच्या भावात गेली दोन वर्षे तेजी होती. त्यामुळेही कापसाचे भाव हमी किमतीपेक्षा जास्त दिले. आज २ हजार २०० रुपयांच्या आसपास सरकीचा भाव आहे. हा भाव टिकून राहिला व रुपया ७३-७५ रुपये १ डॉलर हा विनियम दर राहिला तर कापसाला ६ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कापूस आयातीवर आयात कर नाही व निर्यातीलाही सबसिडी नाही.

रुपयाच्या अवमूल्यनानंतरही ऊस, तेलबिया, डाळी उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठेत फटकाच बसणार आहे. सरकारच्या प्रचंड हस्तक्षेपाची गरज आहे. आज जागतिक बाजारात साखरेचा भाव ३३० डॉलर प्रति टन (म्हणजे १० क्विंटल) आहे. म्हणजेच २३-२४ रुपये किलो आहे. सरकारने ५० टक्के आयात कर लावला आहे. साखर निर्यातीला सबसिडी दिली आहे. ती वाढविण्याचा विचार सुरू आहे. खाद्य तेलाची ६० टक्के आपण आयात करतो. खाद्य तेलात प्रचंड मंदी आहे. ४० ते ५० टक्के आयात कर लावला आहे. तरी ६० ते ७० रुपयेच आयात तेलाचा भाव आहे.

सोयाबीन, भुईमूग यांना हमीभाव मिळण्याची शक्यता कमीच आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे थोड्या फार प्रमाणात शेतक-यांचे संरक्षण होईल; पण सरकारच्या हमीभावाच्या खरेदीचे संरक्षण गरजेचे झाले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना बाजाराची ही विषम परिस्थिती आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारcottonकापूस