मुरबाड : मुरबाड-कर्जत हा महामार्ग शासनाने असाइड योजनेतून चौपदरी करण्याचे काम हाती घेतल्यामुळे या रु ंदीकरणामुळे मौजे म्हसा येथील स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर राहणारी अनेक कुटुंबे बेघर होऊन त्यांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपले संसार वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.१९६० ते १९६२ मध्ये मुरबाड-कर्जत हा मार्ग शासनाने तयार केला. त्या वेळी मौजे म्हसा येथील मगन पांडुरंग घागस, भालचंद्र नारायण कुर्ले, गोविंद गणपत बांगर, विठ्ठल जानू कुर्ले, अरु ण दत्तात्रेय कुर्ले, भाऊ उंद्रू कुर्ले, वसंत बाळू कुर्ले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी स्वत:हून सुमारे सात मीटरचा रस्ता करण्यास जमिनी दिल्या. परंतु, १९८२ मध्ये जेव्हा हा मार्ग रु ंदीकरण करण्याचे शासनाने ठरविले, त्या वेळी त्याच शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा न देता संपादित केल्या. त्यानुसार, त्यांचे नाव ७/१२ वरूनही कमी करून घेतले. या घेतलेल्या अतिरिक्त जमिनीचा त्यांना मोबदलादेखील देण्याचा शासनाने एकदाही विचार न केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्यालगत असणाऱ्या आपल्या मालकीच्या जमिनीवर रस्त्यालगत राहण्यासाठी घरे बांधलेली आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा देवस्थानाला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याने या ठिकाणी मोठी यात्रा व आठवडाबाजार भरत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या पूरक व्यवसायासाठी गाळ्यांचे बांधकाम केले आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. (प्रतिनिधी)
संसार वाचवण्यासाठी न्यायालयात धाव
By admin | Updated: October 3, 2015 03:17 IST