शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हज यात्रेकरूंचा कोटा वाढविल्याची अफवा

By admin | Updated: July 13, 2016 23:23 IST

देशासह महाराष्ट्र राज्यातील हज यात्रेकरूंचा कोटा यावर्षी सौदी अरेबिया सरकारने वाढविल्याची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने नागरिकांना वाचून सुखद धक्का बसला; मात्र

- अझहर शेख

नाशिक : देशासह महाराष्ट्र राज्यातील हज यात्रेकरूंचा कोटा यावर्षी सौदी अरेबिया सरकारने वाढविल्याची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने नागरिकांना वाचून सुखद धक्का बसला; मात्र राज्याच्या हज समितीने ही पोस्ट निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.हज यात्रा-२०१६ साठी सौदी सरकारकडून संपूर्ण जगाचा हज यात्रेकरूंचा कोटा वाढविण्यात आला असून भारतासाठीही वीस हजारांचा कोटा वाढविला गेल्याचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाला. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून सलग अर्ज करूनही अद्याप प्रतीक्षा यादीत असलेल्या हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; मात्र राज्याच्या हज समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर याप्रकारची कुठलीही माहिती उपलब्ध नसून पदाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही अधिकृतरीत्या कें द्रीय हज समितीकडून अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. एकूणच हज यात्रेकरूंचा कोटा वाढविण्यात आल्याची व्हॉट्सअ‍ॅपवर फि रणारी पोस्ट निव्वळ अफवा आहे. या पोस्टवर कु ठल्याही प्रकारचा नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्ह्याचे हज यात्रा प्रशिक्षक जहीर शेख यांनी केले आहे.२०११च्या जनगणनेनुसार मुस्लीम लोकसंख्येनुसार हज यात्रेकरूंचा कोटा राज्यनिहाय जाहीर करण्यात आला आहे. सात हजार ८४ मूळ कोटा असून २७३ यात्रेकरूंचा अतिरिक्त कोटा आहे. राज्यासाठी एकूण सात हजार ३५७ इतका कोटा जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून दोनशे यात्रेकरू हज समितीकडून जाणार असून चार वर्षांपासून जिल्ह्यातील ५८ इच्छुक सलग अर्ज भरूनही प्रतीक्षा यादींमध्ये आहे. संपूर्ण राज्यातून तीन हजार २८८ इच्छुक प्रतीक्षा यादीमध्ये आहे. आॅगस्टच्या ४ तारखेपासून यात्रेसाठी विमाने उड्डाण घेण्यास सुरुवात करणार आहेत. अखेरचे विमान ५ सप्टेंबर रोजी सौदीकडे उड्डाण घेणार आहे; मात्र सौदी सरकारने अद्याप हज यात्रेकरूंचा व्हिसा प्राप्त होऊ शकलेला नाही. राज्यभरातून ४७ हजार अर्जहज यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या एकूण ४७ हजार ७५९ नागरिकांनी हज समितीकडे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी संगणकीय भाग्यवंत सोडतीद्वारे सात हजार ३५७ यात्रेक रूंची समितीने मंगळवारी (दि. १२) निवड केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या दोनशे नागरिकांचा समावेश आहे. सोडत राखीव श्रेणीमधून काढण्यास प्राधान्य देण्यात आले. राखीव श्रेणीमध्ये सलग चार वर्षांपासून अर्ज करणाऱ्या व्यक्तींचा तसेच वर्षाच्या सत्तरी गाठलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.