शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

हज यात्रेकरूंचा कोटा वाढविल्याची अफवा

By admin | Updated: July 13, 2016 23:23 IST

देशासह महाराष्ट्र राज्यातील हज यात्रेकरूंचा कोटा यावर्षी सौदी अरेबिया सरकारने वाढविल्याची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने नागरिकांना वाचून सुखद धक्का बसला; मात्र

- अझहर शेख

नाशिक : देशासह महाराष्ट्र राज्यातील हज यात्रेकरूंचा कोटा यावर्षी सौदी अरेबिया सरकारने वाढविल्याची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने नागरिकांना वाचून सुखद धक्का बसला; मात्र राज्याच्या हज समितीने ही पोस्ट निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.हज यात्रा-२०१६ साठी सौदी सरकारकडून संपूर्ण जगाचा हज यात्रेकरूंचा कोटा वाढविण्यात आला असून भारतासाठीही वीस हजारांचा कोटा वाढविला गेल्याचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाला. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून सलग अर्ज करूनही अद्याप प्रतीक्षा यादीत असलेल्या हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; मात्र राज्याच्या हज समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर याप्रकारची कुठलीही माहिती उपलब्ध नसून पदाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही अधिकृतरीत्या कें द्रीय हज समितीकडून अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. एकूणच हज यात्रेकरूंचा कोटा वाढविण्यात आल्याची व्हॉट्सअ‍ॅपवर फि रणारी पोस्ट निव्वळ अफवा आहे. या पोस्टवर कु ठल्याही प्रकारचा नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्ह्याचे हज यात्रा प्रशिक्षक जहीर शेख यांनी केले आहे.२०११च्या जनगणनेनुसार मुस्लीम लोकसंख्येनुसार हज यात्रेकरूंचा कोटा राज्यनिहाय जाहीर करण्यात आला आहे. सात हजार ८४ मूळ कोटा असून २७३ यात्रेकरूंचा अतिरिक्त कोटा आहे. राज्यासाठी एकूण सात हजार ३५७ इतका कोटा जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून दोनशे यात्रेकरू हज समितीकडून जाणार असून चार वर्षांपासून जिल्ह्यातील ५८ इच्छुक सलग अर्ज भरूनही प्रतीक्षा यादींमध्ये आहे. संपूर्ण राज्यातून तीन हजार २८८ इच्छुक प्रतीक्षा यादीमध्ये आहे. आॅगस्टच्या ४ तारखेपासून यात्रेसाठी विमाने उड्डाण घेण्यास सुरुवात करणार आहेत. अखेरचे विमान ५ सप्टेंबर रोजी सौदीकडे उड्डाण घेणार आहे; मात्र सौदी सरकारने अद्याप हज यात्रेकरूंचा व्हिसा प्राप्त होऊ शकलेला नाही. राज्यभरातून ४७ हजार अर्जहज यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या एकूण ४७ हजार ७५९ नागरिकांनी हज समितीकडे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी संगणकीय भाग्यवंत सोडतीद्वारे सात हजार ३५७ यात्रेक रूंची समितीने मंगळवारी (दि. १२) निवड केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या दोनशे नागरिकांचा समावेश आहे. सोडत राखीव श्रेणीमधून काढण्यास प्राधान्य देण्यात आले. राखीव श्रेणीमध्ये सलग चार वर्षांपासून अर्ज करणाऱ्या व्यक्तींचा तसेच वर्षाच्या सत्तरी गाठलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.