शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

‘आडव्या बाटली’साठीचे नियम तेच राहणार; दारू दुकान बंदसाठी मनपाचा ठराव ग्राह्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:25 IST

उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी एकूण दुकानांच्या तीन टक्के दुकाने वाढविली जातात. एक लाख नागरिकांच्या मागे दारू दुकानांचे प्रमाण इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कमी आहे.

मुंबई : एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर महिलांचे किती टक्के मतदान व्हावे, या संबंधीच्या नियमात कोणताही बदल केला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले. 

खारघर येथील दारू दुकान बंद करण्याची मागणी करत भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. भाजपचे अभिमन्यू पवार चर्चेत सहभागी झाले. वॉर्डातील २५% महिलांनी दुकान बंद करण्याची मागणी केली पाहिजे, त्यानंतर जे मतदान होईल त्यात एकूण मतदारांच्या कमीतकमी ५०% महिलांनी दुकान बंद करण्याच्या बाजूने मतदान केले पाहिजे तरच ते बंद केले जाईल. 

हा २००९ पासूनचा सरकारचा नियम, त्यात बदल नाहीहा २००९ पासूनचा सरकारचा नियम आहे. त्यात बदल केला जाणार नाही असे अजित पवार म्हणाले. महापालिका वा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने ठराव केला म्हणून दुकान बंद करता येणार नाही. संबंधित गृहनिर्माण संस्थेचा ठरावही गृहित धरला जाणार नाही. राज्यात दारूबंदी असलेले वर्धा आणि गडचिरोली हे दोन जिल्हे आहेत. चंद्रपूरमध्ये दारूबंदी केलेली होती, पण तेथे अवैध दारूचे प्रमाण वाढले, तरुण मुले अवैध दारूविक्रीतून पैसे कमावत होते, असे अजित पवार म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी एकूण दुकानांच्या तीन टक्के दुकाने वाढविली जातात. एक लाख नागरिकांच्या मागे दारू दुकानांचे प्रमाण इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कमी आहे. १९७२ पासून नवीन दारू दुकानांसाठीचा एकही परवाना देण्यात आलेला नाही.

दारू दुकान बंदसाठी मनपाचा ठराव ग्राह्य नाहीएखादे दारू दुकान बंद करण्यासाठी महापालिकेने ठराव केला आहे म्हणून ते दुकान बंद केले जाणार नाही. महापालिकेला असा ठराव करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. खारघर हे पूर्वी ग्रामपंचायतीचे गाव होते, ते नंतर पनवेल महापालिकेत समाविष्ट झाले. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव केलेला होता, पण आता महापालिकेत ते समाविष्ट झाल्याने तेव्हाच्या खारघर हद्दीतील दुकान आता बंद ठेवता येणार नाही असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.