शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विविधता नष्ट करणारे राज्यकर्ते स्वत:च्या देशालाच कमकुवत करतात- सिद्धार्थ वरदराजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 10:14 IST

पां. वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

नागपूर : जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृतींचे लोक राहतात व ही विविधताच त्या देशांची शक्ती आहे. परंतु ज्या राज्यकर्त्यांना ही विविधता दुर्बलता वाटते, ते त्या विविधतेच्या प्रतीकांना हटविण्याचे प्रयत्न करतात. मात्र ज्या नेत्यांनी या दिशेने पावले उचलली आहेत, त्यांनी आपल्या देशालाच कमकुवत केले आहे, याची इतिहासात नोेंद आहे. रशिया युद्धखोर आहेच, मात्र युक्रेनने विविधता नष्ट करण्याची चूकदेखील जगाने दखल घेण्यासारखी आहे. सर्वच देशांनी विविधतेचा सन्मान करायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी केले.  ‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१७-१८, २०१८-१९ व २०२०-२१ चे बुधवारी थाटात वितरण करण्यात आले. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खा. कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा,‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक (सीएमडी) दिलीप तिखिले हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘युक्रेन-रशियाचे युद्ध व त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर वरदराजन यांनी भाष्य केले. रशियाने-युक्रेनवर आक्रमणच केले असून, कायदेशीरदृष्ट्या अनैतिक युद्ध ते लढत आहेत. परंतु या युद्धासाठी रशियाप्रमाणे, युक्रेनदेखील जबाबदार आहे. रशियन मूळ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भागात युक्रेनने आश्वासनांचे पालन केले नाही. तेथील लोक युक्रेनमध्येच सन्मानाने जगू इच्छित होते. मात्र, युक्रेनच्या राज्यकर्त्यांनी समजूतदारपणा दाखविला नाही. युक्रेनने आपलेपणाची भावना न दाखविल्यामुळे ते नागरिक बाहेरच्यांकडे आशेने पाहू लागले व याचीच परिणती युद्धात झाली. या युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती शीतयुद्धानंतरची सर्वांत भीषण स्थिती आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम दिसतील. अमेरिका व युरोपमधील संरक्षण व आर्थिक संबंध जास्त वृद्धिंगत होतील. सोबतच रशिया आर्थिक व सैन्यदृष्ट्या कमकुवत होईल. या युद्धामुळे जगभरात परत एकदा शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू होईल. यातून चीनला फायदा होईल व भविष्यात भारताला धोका निर्माण होईल, असे वरदराजन यांनी व्यक्त केले.‘लोकमत’सारख्या वर्तमानपत्रांनी केवळ वृत्तच प्रकाशित केले नाही तर, प्रशासनालादेखील वेळोवेळी आरसा दाखवून समाजात सुधारणा घडविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध समस्या सोडविण्यात व प्रशासनाला दिशा दाखविण्यात वर्तमानपत्रांचे मौलिक योगदान असते, असे प्रतिपादन प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. राजेंद्र दर्डा यांनी स्वागतपर भाषण केले. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळ कुलकर्णी यांनी संचालन केले तर, दिलीप तिखिले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, माहिती आयुक्त राहुल पांडे, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, द हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देवेंद्र वानखेडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण, वरिष्ठ पत्रकार अजय पांडे आदी उपस्थित होते.‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराचे मानकरीम. य. दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार (२०१७-१८)१. मनोज शेलार, लोकमत-नंदुरबार२. विठ्ठल खेळगी, दै. पुण्यनगरी, सोलापूर३. दत्ता यादव, लोकमत, सातारापां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा (२०१७-१८)१. श्रीनिवास नागे, लोकमत, सांगली२. शांताराम गजे, मुक्त पत्रकार, अहमदनगर३. सुरेश वांदिले, सेवानिवृत्त माहिती अधिकारी, मुंबईम. य. दळवी शोध पत्रकारिता स्पर्धा पुरस्कार (२०१८-१९)१. नरेश डोंगरे, लोकमत, नागपूर२. प्रदीप राऊत, तरुण भारत, मुंबई३. संजय पाटील, लोकमत, कऱ्हाडपां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा पुरस्कार (२०१८-१९)१. विलास पंढरी, सामना, पुणे२. हनमंत पाटील, लोकमत, पिंपरी चिंचवड३. प्रमोद जाधव, समाजकल्याण उपायुक्त, सिंधुदुर्ग म. य. दळवी शोध पत्रकारिता स्पर्धा पुरस्कार (२०१९-२०)१. सुधीर लंके, लोकमत, अहमदनगर२. संतोष सूर्यवंशी, सकाळ, नाशिक३. गणेश वासनिक, लोकमत, अमरावतीपां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा पुरस्कार (२०१९-२०)१. ॲड. कांतीलाल तातेड, लोकसत्ता, नाशिक२. प्रवीण घोडेस्वार, परिवर्तनाचा वाटसरू, नाशिक३. प्रा. संजय ठिगळे, लोकमत, सांगली