शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

“...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 12:23 IST

RSS Mohan Bhagwat: संविधानाने जे आरक्षण दिले आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

RSS Mohan Bhagwat: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लाचा निषेध संपूर्ण राज्यभरात नोंदवला गेला. याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आरक्षणाबाबतराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठे विधान केले आहे. 

सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण आपल्या बांधवांना मागे टाकले आहे. आपण त्यांची काळजी घेतली नाही. गेल्या २००० वर्षांपासून असेच चालत आले आहे. जोपर्यंत आपण त्यांना समानतेने वागवत नाही, तोपर्यंत काही विशेष गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक आरक्षण आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम असायला हवे. जोपर्यंत समाजात भेदभाव अस्तित्वात आहे. तोपर्यंत आरएसएसचा संविधानात दिलेल्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. भेदभाव दिसत नसला तरी समाजात तो प्रचलित आहे, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

आरक्षणासारखे उपाय करणे आवश्यक आहे

जेव्हा वंचित समाजातील व्यक्ती राष्ट्रपती झाली. देशाच्या, मग आरक्षणाची गरज काय? जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या आहेत, तर आरक्षण का रद्द केले जात नाही? असा प्रश्न एका विद्यार्थाने विचारला. यावर बोलताना, आपल्या देशात सामाजिक विषमतेचा इतिहास लक्षात घेऊन आरक्षण दिले गेले आहे. ज्यांनी भेदभाव केला. आमच्यासोबत राहिले, त्यांना मागे ठेवले, त्यांची आपण काळजी केली नाही आणि हे असेच दोन हजार वर्षे चालले. त्यामुळे त्यांना बरोबरीत आणेपर्यंत आरक्षणासारखे उपाय करणे आवश्यक आहे, असे मोहन भागवत म्हणाले. हे केवळ आर्थिक किंवा राजकीय समानता सुनिश्चित करण्यासाठी नाही, तर सन्मान देण्यासाठी आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

दरम्यान, संविधानानुसार जे आरक्षण आहे, त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. जरी भेदभाव दिसत नसले तरी भेदभाव अजूनही आहे. आरक्षणामुळे मोठ्या नोकऱ्या मिळत असल्या तरी भेदभाव अजूनही कायम आहे. हिंदू समाजात सर्वांसाठी मंदिर, पाणी, स्मशानभूमी, जमीन एक असली पाहिजे. अशी परिस्थिती संघाच्या शाखा आणि इतर ठिकाणी निर्माण होणे गरजेचे आहे. ज्यांना आरक्षण मिळते त्यातही काही लोक उभे राहून म्हणू लागले आहेत की, आरक्षणामुळे आम्ही सक्षम झालो आहोत, आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही. म्हणून ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण द्या, असे मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतreservationआरक्षण