शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Politics: “एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 10:09 IST

Maharashtra News: आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. जगाला भारताची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर आदर्श नाही. भगवा ध्वज आपल्यासमोर आदर्श आहे. आपल्या समोर तत्त्व आहेत आणि तत्त्वांमध्ये जर काही चिन्ह असेल तर तो भगवा ध्वज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, रामभक्त हनुमान हे आमचे आदर्श आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. संपूर्ण जगाला या देशाची गरज आहे. आपले जीवन देशासाठी आहे. आपण जे काही कमावू, त्याचा देशासाठी त्याग करायला हवा. नव्या पिढीची आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे, आपल्या कर्मावर आपण भर दिला पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले. 

धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे

सनातन धर्म हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा हिंदू राष्ट्राची प्रगती होते, तेव्हा ती धर्माच्या प्रगतीसाठी असते. आता सनातन धर्माची उन्नती व्हायला हवी. भारत नेहमीच अमर आणि अपराजित राहिला आहे. धर्म हे या देशाचे सत्व आणि सार आहे. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याशिवाय जीवन चालू शकत नाही, असे मोहन भागवत म्हणाले. 

धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही

धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही. तर धर्म हा मूल्य, सत्य, करुणा, शुद्धता आणि तपस्या यांप्रमाणे अतिशय महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी शेकडो वर्षांपासून अनेक आक्रमणे सोसूनही भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. कारण तेथील लोकांनी धर्म सत्व जपले आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत