शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

“धर्माचे अपुरे ज्ञानच अधर्माला जन्म देते, पण...”; मोहन भागवत यांचा धर्मगुरुंना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:41 IST

RSS Chief Mohan Bhagwat News: संघ धर्म रक्षणाचेच कार्य करतो आहे. प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे देशाचे वैभव आहेत, असे RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

RSS Chief Mohan Bhagwat News: धर्म नीटपणे समजून घ्यावा लागतो. धर्म नीट समजला नाही, तर धर्माचे अपुरे ज्ञान अधर्माला जन्म देते धर्माचे अयोग्य आणि अपूर्ण ज्ञान अधर्माकडे घेऊन जाते. धर्माच्या नावावर जगभरात जे काही अत्याचार होत आहेत, ते धर्माबाबतच्या गैरसमजामुळे घडले आहे. त्यामुळे संप्रदायांनी योग्य पद्धतीने धर्म समजावून सांगायला हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, सृष्टीच्या प्रारंभापासून धर्म आहे, म्हणूनच त्याला सनातन म्हणतात. जो धर्माला मानतो, त्याचे कल्याण होते. धर्म हा सत्याचा आकार असल्याने त्याचे रक्षण झाले पाहिजे. धर्माचे आचरणकर्तेच त्याचे रक्षणकर्ते आहेत. धर्माचे आचरण समजले पाहिजे आणि समजल्यावर मनात ठेऊन चालणार नाही, तर ते आचरणात आणून धर्माला अपेक्षित कृती झाली पाहिजे. धर्म समजावा लागतो तो समजवणे कठीण असले तरी तो समजवता येतो, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे देशाचे वैभव

धर्माच्या नावाखाली अत्याचार पूर्वी झाले ते चुकीच्या समजुतीने झाले. प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे आपल्या देशाचे वैभव आहे. संप्रदाय कोणताही असो तो एकमेकांना जोडायला शिकवतो. ऐक्य हे शाश्वत असते. सगळे विश्व एक आहे. अहिंसेने वागणे हेच धर्माचे रक्षण आहे. संघ धर्म रक्षणाचेच कार्य करतो आहे. सत्य  संकल्पाने कार्य केले की ते पूर्ण होतात, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माला नीट समजून घेतल्यास समाजात शांतता, सौहार्द आणि समृद्धी येऊ शकते. धर्माचा खरा उद्देश मानवतेची सेवा करणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचारांना प्रोत्साहन देणे नाही. धर्माच्या मूलभूत तत्त्वांवर भर देताना ते म्हणाले की, धर्माचे अचूक ज्ञान आणि पालन केल्याने समाजाची उन्नती होते आणि सर्वांचे कल्याण होते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत