शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

“धर्माचे अपुरे ज्ञानच अधर्माला जन्म देते, पण...”; मोहन भागवत यांचा धर्मगुरुंना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:41 IST

RSS Chief Mohan Bhagwat News: संघ धर्म रक्षणाचेच कार्य करतो आहे. प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे देशाचे वैभव आहेत, असे RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

RSS Chief Mohan Bhagwat News: धर्म नीटपणे समजून घ्यावा लागतो. धर्म नीट समजला नाही, तर धर्माचे अपुरे ज्ञान अधर्माला जन्म देते धर्माचे अयोग्य आणि अपूर्ण ज्ञान अधर्माकडे घेऊन जाते. धर्माच्या नावावर जगभरात जे काही अत्याचार होत आहेत, ते धर्माबाबतच्या गैरसमजामुळे घडले आहे. त्यामुळे संप्रदायांनी योग्य पद्धतीने धर्म समजावून सांगायला हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, सृष्टीच्या प्रारंभापासून धर्म आहे, म्हणूनच त्याला सनातन म्हणतात. जो धर्माला मानतो, त्याचे कल्याण होते. धर्म हा सत्याचा आकार असल्याने त्याचे रक्षण झाले पाहिजे. धर्माचे आचरणकर्तेच त्याचे रक्षणकर्ते आहेत. धर्माचे आचरण समजले पाहिजे आणि समजल्यावर मनात ठेऊन चालणार नाही, तर ते आचरणात आणून धर्माला अपेक्षित कृती झाली पाहिजे. धर्म समजावा लागतो तो समजवणे कठीण असले तरी तो समजवता येतो, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे देशाचे वैभव

धर्माच्या नावाखाली अत्याचार पूर्वी झाले ते चुकीच्या समजुतीने झाले. प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे आपल्या देशाचे वैभव आहे. संप्रदाय कोणताही असो तो एकमेकांना जोडायला शिकवतो. ऐक्य हे शाश्वत असते. सगळे विश्व एक आहे. अहिंसेने वागणे हेच धर्माचे रक्षण आहे. संघ धर्म रक्षणाचेच कार्य करतो आहे. सत्य  संकल्पाने कार्य केले की ते पूर्ण होतात, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माला नीट समजून घेतल्यास समाजात शांतता, सौहार्द आणि समृद्धी येऊ शकते. धर्माचा खरा उद्देश मानवतेची सेवा करणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचारांना प्रोत्साहन देणे नाही. धर्माच्या मूलभूत तत्त्वांवर भर देताना ते म्हणाले की, धर्माचे अचूक ज्ञान आणि पालन केल्याने समाजाची उन्नती होते आणि सर्वांचे कल्याण होते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत