शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:30 IST

कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे असून, शेतकरीविरोधी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकºयांच्या कल्याणाच्या योजना परिणामकारक ठरू शकत नाहीत, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे हा देश बलशाली करण्याचा कार्यक्रम आहे, असेही हबीब म्हणाले आहेत.किसानपुत्र आंदोलनच्या ७व्या राज्यस्तरीय शिबिराच्या अर्थात, किसानपुत्र कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमर हबीब यांनी सांगितले, पुण्यातील डोणजे येथील वाडा फार्म हाउस येथे हे शिबिर होईल. आपल्या देशात कायद्यांनी व्यवस्था निर्माण केली आहे. गॅट करारावर सही करून आपल्या सरकारने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले, पण शेती क्षेत्रात उदारीकरण येऊ दिले नाही. सिलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे उदारीकरण विरोधी तीन कायदे तसेच ठेवले. परिणामी, शिबिरात किसानपुत्र आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.२३ नोव्हेंबर रोजीचे विषयनिवडणुकीत किसानपुत्रांची भूमिका निर्णायक का ठरत नाही? आंदोलनाचे बदलते स्वरूप व काल सुसंगत आंदोलनाची दिशा, न्यायालयीन लढाई पुढे नेण्यासाठी आणखी काय करणे आवश्यक आहे? आवश्यक वस्तू कायदा वर्षभराच्या आत रद्द करून घेण्यासाठी नेमके काय करावे लागेल? आगामी वाटचालीसाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे का? तिचे स्वरूप कसे असावे?२४ नोव्हेंबर रोजीचे विषयवार्षिक कार्यक्रम, शहरी भागांत विस्तार करण्यासाठी आणखी काय उपाय करता येतील? महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? महाराष्ट्रातील किसानपुत्र कायदे रद्द करण्यासाठी काय जबाबदारी घेऊ शकतात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.हे शेतकरीविरोधी कायदे रद्द कराकमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग)आवश्यक वस्तूंचा कायदाजमीन अधिग्रहण कायदा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या