शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:30 IST

कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे असून, शेतकरीविरोधी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकºयांच्या कल्याणाच्या योजना परिणामकारक ठरू शकत नाहीत, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे हा देश बलशाली करण्याचा कार्यक्रम आहे, असेही हबीब म्हणाले आहेत.किसानपुत्र आंदोलनच्या ७व्या राज्यस्तरीय शिबिराच्या अर्थात, किसानपुत्र कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमर हबीब यांनी सांगितले, पुण्यातील डोणजे येथील वाडा फार्म हाउस येथे हे शिबिर होईल. आपल्या देशात कायद्यांनी व्यवस्था निर्माण केली आहे. गॅट करारावर सही करून आपल्या सरकारने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले, पण शेती क्षेत्रात उदारीकरण येऊ दिले नाही. सिलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे उदारीकरण विरोधी तीन कायदे तसेच ठेवले. परिणामी, शिबिरात किसानपुत्र आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.२३ नोव्हेंबर रोजीचे विषयनिवडणुकीत किसानपुत्रांची भूमिका निर्णायक का ठरत नाही? आंदोलनाचे बदलते स्वरूप व काल सुसंगत आंदोलनाची दिशा, न्यायालयीन लढाई पुढे नेण्यासाठी आणखी काय करणे आवश्यक आहे? आवश्यक वस्तू कायदा वर्षभराच्या आत रद्द करून घेण्यासाठी नेमके काय करावे लागेल? आगामी वाटचालीसाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे का? तिचे स्वरूप कसे असावे?२४ नोव्हेंबर रोजीचे विषयवार्षिक कार्यक्रम, शहरी भागांत विस्तार करण्यासाठी आणखी काय उपाय करता येतील? महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? महाराष्ट्रातील किसानपुत्र कायदे रद्द करण्यासाठी काय जबाबदारी घेऊ शकतात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.हे शेतकरीविरोधी कायदे रद्द कराकमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग)आवश्यक वस्तूंचा कायदाजमीन अधिग्रहण कायदा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या