शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:30 IST

कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे असून, शेतकरीविरोधी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकºयांच्या कल्याणाच्या योजना परिणामकारक ठरू शकत नाहीत, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे हा देश बलशाली करण्याचा कार्यक्रम आहे, असेही हबीब म्हणाले आहेत.किसानपुत्र आंदोलनच्या ७व्या राज्यस्तरीय शिबिराच्या अर्थात, किसानपुत्र कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमर हबीब यांनी सांगितले, पुण्यातील डोणजे येथील वाडा फार्म हाउस येथे हे शिबिर होईल. आपल्या देशात कायद्यांनी व्यवस्था निर्माण केली आहे. गॅट करारावर सही करून आपल्या सरकारने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले, पण शेती क्षेत्रात उदारीकरण येऊ दिले नाही. सिलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे उदारीकरण विरोधी तीन कायदे तसेच ठेवले. परिणामी, शिबिरात किसानपुत्र आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.२३ नोव्हेंबर रोजीचे विषयनिवडणुकीत किसानपुत्रांची भूमिका निर्णायक का ठरत नाही? आंदोलनाचे बदलते स्वरूप व काल सुसंगत आंदोलनाची दिशा, न्यायालयीन लढाई पुढे नेण्यासाठी आणखी काय करणे आवश्यक आहे? आवश्यक वस्तू कायदा वर्षभराच्या आत रद्द करून घेण्यासाठी नेमके काय करावे लागेल? आगामी वाटचालीसाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे का? तिचे स्वरूप कसे असावे?२४ नोव्हेंबर रोजीचे विषयवार्षिक कार्यक्रम, शहरी भागांत विस्तार करण्यासाठी आणखी काय उपाय करता येतील? महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? महाराष्ट्रातील किसानपुत्र कायदे रद्द करण्यासाठी काय जबाबदारी घेऊ शकतात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.हे शेतकरीविरोधी कायदे रद्द कराकमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग)आवश्यक वस्तूंचा कायदाजमीन अधिग्रहण कायदा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या