शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
3
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
4
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
5
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
6
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
7
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
8
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
9
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
10
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
11
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
12
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
13
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
14
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
15
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
16
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
17
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
18
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
19
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
20
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...

रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 13:24 IST

आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली असं रोहित पाटील म्हणाले.

मुंबई - आबांच्या पश्चात अनेकदा मानापमानाचे प्रसंग आमच्या कुटुंबावर आले, आबा गेल्यामुळे काहींना मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी आहे असं वाटल्यानं ते विरोधात गेले. दंडुकेशाही, दडपशाहीचं राजकारण सुरू झालं असा आरोप करत रोहित पाटील यांनी त्यांच्यासह कुटुंबावर झालेल्या दगडफेकीचा थरारक प्रसंग सांगितला आहे.

रोहित पाटील म्हणाले की, मी दहावीत होतो, फेब्रुवारी महिन्यात आबांचं निधन झालं. आबा गेल्यानंतर मी बोर्डाच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक लागली. त्यात सर्वपक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करायची ठरवलं. त्यात एक अपक्ष निवडणुकीत उभे राहिले तरीसुद्धा लोकांनी मोठ्या मताधिक्याने लोकांनी आईला निवडून दिले. जून महिन्यात बाजारसमितीची निवडणूक लागली. त्या बाजारसमितीच्या निवडणुकीत स्थानिक प्रतिनिधींना असं वाटलं की आता आबा गेलेत, आता ही संधी आहे. ज्याप्रकारे आबांविरोधात आपण कार्य केले आहे तसेच एकूण तासगाव तालुक्यात दडपशाही, दंडुकेशाहीचं वातावरण असायचं तशारितीने काहीतरी करता येतंय का असा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केला. झी २४ तासनं घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आई, मी बहिण, चुलते आणि १५-२० कार्यकर्ते तिथे होते. समोरून दगडफेक चालू झाली असं लक्षात येताच मतदान केंद्राजवळ एक लग्न कार्यालय होतं तिथे नेले आणि शटर बंद करून घेतले. पावसात पत्र्यावर पाणी पडताना जो आवाज येतो तशी दगडे त्या मंगल कार्यालयावर पडत होती. थोडं व्हेटिंलेशनसाठी पत्रा आणि शटरमध्ये गॅप होता. काही दगडंसुद्धा आत येत होती. आईसोबत ३-४ महिला होत्या. आबांचे जुने सहकारी आमच्यासोबत होते तेव्हा एक दगड माझ्यासमोर त्यांच्या डोक्यात बसला. त्यांच्या डोक्यावर मी रुमाल धरल्याचं आठवतंय. स्मितादिदी धाडसाने पुढे जात होती. एकूण आत असलेल्या सर्व लोकांची मानसिकता घाबरलेली होती. ती परिस्थिती मी बघितली. माझं वय १५-१६ वर्ष होतं. त्यामुळे जी भीती वाटत होती ती त्या कार्यालयात मोडली. यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही हा विचार माझ्या मनात आला असंही रोहित पाटलांनी म्हटलं.

दरम्यान, आबांच्या पश्चात जे त्यांचे सहकारी होते त्यांनी आमची वाटचाल सोयीस्कर करण्याचा प्रयत्न केला. आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली. आपण कष्ट केले तर येणाऱ्या परिस्थितीवर मात करू शकतो हे कळालं. अनेकवेळा मानापमानाचे प्रसंग आले. जे लोक आबा असताना तासनतास घरी थांबायचे ते लोक भेटायलाही वेळ देत नव्हते अशी वेळ आली. तो फरक माझ्या कुटुंबाला जाणवत होता. हा अपमान कुठेतरी पचवायला शिकलं पाहिजे हे आजी सांगायची असं रोहित पाटील यांनी सांगितले. 

मतदारसंघात चांगली फळी तयार केली 

जे अधिकारी आबांसोबत काम करायचे, आबांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असायचे त्यांच्या भेटीला गेलो तर ते वेळ देत नसायचे. तुमचं साधं ट्रॅफिक पोलीस ऐकत नाहीत तुम्ही राजकारण सोडून द्या असं कार्यकर्ते म्हणायचे. राजकारणाची सुरूवात आईचा भार कमी करावा, मतदारसंघात तिला जास्त फिरावं लागू नये म्हणून झाली. त्यातून आवड निर्माण झाली. पडझडीच्या राजकारणातून आम्हाला नवी फळी उभारायची होती. २०१६-१७ या काळात कुणी आमच्यासोबत यायला तयार नव्हते. मात्र आज जे माझ्यासोबत होते ते कुणी नगरसेवक आहेत, कुणी नगराध्यक्ष झालं, गावागावात फिरणारी मुले ग्रामपंचायत सदस्य झाले. चांगली फळी आम्ही तयार केली असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Rohit Patilरोहित पाटिलElectionनिवडणूक 2024