शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही”; रोहित पाटलांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 16:53 IST

Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास आणि नवनिर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तसेच शरद पवारांचा मोठा हात आहे, असे रोहित पाटील यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर टीका करताना दिसत आहेत. अलीकडेच पडळकर यांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही, असे रोहित पाटील यांनी नमूद केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लागला आहे. भाजपचा हा झेंडा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावरही लागलेला दिसेल, असे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आता आपल्याला भाजपमध्येच जावे लागेल, असे ९० टक्के कार्यकर्ते म्हणतील आणि मग मुंबईच्या कार्यालयावर नेमका कोणाचा झेंडा लागेल असा त्यांच्यात वाद निर्माण होईल. ९० टक्के राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल. तर बहुमताने लोक भारतीय जनता पक्षात येतील, असा मोठा दावा गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच केला होता. याला रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही

असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते आणि आपला जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापनेबरोबर झाला आहे. त्यामुळे आपण तरी राष्ट्रवादीशिवाय अन्यत्र कुठेही जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा मोठा हात आहे. नवनिर्मिती करणाऱ्या शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचा विकास कोणी केला याची कल्पना सर्वांनाच आहे. शेतकऱ्यांनाही याची कल्पना आहे. पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपवू शकत नाही. त्यामुळे असा पक्ष संपणार नाही, असे रोहित पाटील यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, नगरसेवकावर दबाव टाकला हे योग्य नाही. एवढी ताकद लावून निवडणूक चिठ्ठीवर जोरावर जात असेल तर पराभव आमचा की त्यांचा हे तपासावे लागेल. दबाव टाकून निवडणुका जिंकणाऱ्यांना लोकं थारा देणार नाहीत. मात्र मत पेटीतून लोकं उत्तर देतील.कवठमहांकाळमध्ये चिठ्ठी सरकार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसणारे लोक निवडून आले. लोकांनी संधी दिली. पैशाचे आमिषामुळे सर्व बदलले, असेही रोहित पाटील म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :Rohit Patilरोहित पाटिलSharad Pawarशरद पवार