शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Maharashtra Politics: “शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही”; रोहित पाटलांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 16:53 IST

Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास आणि नवनिर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तसेच शरद पवारांचा मोठा हात आहे, असे रोहित पाटील यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर टीका करताना दिसत आहेत. अलीकडेच पडळकर यांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही, असे रोहित पाटील यांनी नमूद केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लागला आहे. भाजपचा हा झेंडा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावरही लागलेला दिसेल, असे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आता आपल्याला भाजपमध्येच जावे लागेल, असे ९० टक्के कार्यकर्ते म्हणतील आणि मग मुंबईच्या कार्यालयावर नेमका कोणाचा झेंडा लागेल असा त्यांच्यात वाद निर्माण होईल. ९० टक्के राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल. तर बहुमताने लोक भारतीय जनता पक्षात येतील, असा मोठा दावा गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच केला होता. याला रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही

असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते आणि आपला जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापनेबरोबर झाला आहे. त्यामुळे आपण तरी राष्ट्रवादीशिवाय अन्यत्र कुठेही जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा मोठा हात आहे. नवनिर्मिती करणाऱ्या शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचा विकास कोणी केला याची कल्पना सर्वांनाच आहे. शेतकऱ्यांनाही याची कल्पना आहे. पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपवू शकत नाही. त्यामुळे असा पक्ष संपणार नाही, असे रोहित पाटील यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, नगरसेवकावर दबाव टाकला हे योग्य नाही. एवढी ताकद लावून निवडणूक चिठ्ठीवर जोरावर जात असेल तर पराभव आमचा की त्यांचा हे तपासावे लागेल. दबाव टाकून निवडणुका जिंकणाऱ्यांना लोकं थारा देणार नाहीत. मात्र मत पेटीतून लोकं उत्तर देतील.कवठमहांकाळमध्ये चिठ्ठी सरकार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसणारे लोक निवडून आले. लोकांनी संधी दिली. पैशाचे आमिषामुळे सर्व बदलले, असेही रोहित पाटील म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :Rohit Patilरोहित पाटिलSharad Pawarशरद पवार