शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

शेतक-यांसाठी पवार उतरणार रस्त्यावर, नाशिकमध्ये घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 04:07 IST

शेतमालाला किंमत नाही, कर्जमाफी देण्याची सरकारची नियत नाही, महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडलेले असल्याने राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली असून, शेतक-यांच्या आंदोलनाला नुसता पाठिंबाच नव्हे

नाशिक : शेतमालाला किंमत नाही, कर्जमाफी देण्याची सरकारची नियत नाही, महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडलेले असल्याने राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली असून, शेतक-यांच्या आंदोलनाला नुसता पाठिंबाच नव्हे, तर त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरण्यास मी स्वत: तयार असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सोमवारी केली. पवार यांनी भाजपाच्या सरकारच्या धोरणांमुळे सर्वच घटक अडचणीत आल्याचे सांगत चौफेर टीकास्त्र सोडले.सरकारला ठरावीक मुदत द्या, त्यांनी शेतक-यांचे सरसकट कर्ज माफ केले नाही, तर मग एकदाच काय ते होऊन जाऊ द्या, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या किसान मंचच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींच्या अधिवेशनात दिला. देशातील सध्याच्या परिस्थितीची सर्वाधिक किंमत कष्टकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गाला मोजावी लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे तर सरकारने सरसकट लूट चालविली आहे, असे ते म्हणाले.लागेबांधे असणा-यांनी आधीच नोटा बदलल्यानोटाबंदीची गोष्ट म्हणजे मारु तीच्या बेंबीसारखी झाली आहे. झटका सगळ्यांना बसला; पण सुरुवातीला कोणी मान्यच केले नाही. सरकारशी लागेबांधे असणाºयांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. सर्वसामान्य रांगेत उभे राहिले, असा आरोप त्यांनी केला.औरंगाबादच्या बैठकीत निर्णय५ नोव्हेंबरला औरंगाबादला राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तोपर्यंत सरकारने मागण्यांबाबत विचार करावा. या बैठकीतच आंदोलनाची तारीख घोषित केली जाईल, असे किसान मंचचे प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी सांगितले. अधिवेशनात संपूर्ण कर्जमाफीसह ९ ठराव करण्यात आले.संपूर्ण कर्जमाफीसाठी असहकारकोणत्याही अटी, शर्ती व निकष न लावता २०१७पर्यंतच्या संपूर्ण कर्जातून शेतकरी, शेतमजुरांची मुक्तता करावी. शेतमाल भाव समितीला कायदेशीर अधिकार देऊन कायद्याने उत्पादन खर्चानुसार भावाची हमी द्यावी. तारण जमिनीच्या मूल्यांकनाच्या ७० टक्के कर्ज पुरविण्याचे धोरण असावे.शेतकºयांचे उत्पन्न किमान तृतीय श्रेणीच्या कर्मचा-यांच्या एवढे सुरक्षित करावे. पेरणी ते काढणीपर्यंतची शेतीकामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावीत आदी नऊ ठराव अधिवेशनात करण्यात आले.‘शेतमालाच्या किमतीशी खेळ करू नका’नाशिक : सरकारने अलीकडेच गहू, ज्वारी, धानाच्या आधारभूत किमतीत फक्त १० ते २० रुपयांनी वाढ केली. देशातील शेतकºयांनी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून कृषी उत्पादनात हात आखडता घेतल्यास देशभरात हाहाकार माजेल. त्यामुळे सरकारने शेतमालाच्या किमतीशी खेळ करू नये. ते देशाला परवडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे दिला. सरकार सत्तेवर आल्यावर सरसकट कर्जमाफी देणार होते, परंतु त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गेला व त्यातही शेतकºयांना सरसकट कर्जमाफी न देता अटी, शर्ती टाकून कर्जमाफी नाकारली जात आहे. खरिपासाठी १० हजारांचे पीककर्ज देण्याचीही नुसतीच भूलथाप होती. त्यामुळे आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असून, राज्यात लागलेली आंदोलनाची आग देशपातळीवर दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे त्यांनी किसान मंचच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींच्या अधिवेशनात सांगितले.शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषी उत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी मोहाडी येथे एका कार्यक्रमात केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीGovernmentसरकारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी