शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

कसारा: ग्रामसडक योजनेचे भर पावसात सुरु, रस्त्याच्या कामासाठी बालमजुरांचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 17:14 IST

लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षमुळे चांगल्या योजनांना हरताळ फासल्याचे चित्र सद्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गांव पाड्यात पाहवयास मिळत आहे.

- शाम धुमाळ

कसारा: विकासापासून दूर असलेल्या आदिवासी पाड्यांची प्रगती व्हावी म्हणून प्रथम दळणवळणाची सोय उत्तम दर्जाची करण्याचा मानस शासनाचा असून त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात करण्यात आली यामुळे गाव-पाड्यात दळणवळणाची सुविधा होईल व  या मागास भागाचा शहरी परिसराशी संपर्क येऊन या गाव-पाड्यांचा  विकास होईल या उद्दात्त हेतूने शासनाने सुरू केलेल्या या योजनेला काही भ्रष्ट ठेकेदार व प्राशसनातील अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षमुळे चांगल्या योजनांना हरताळ फासल्याचे चित्र सद्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गांव पाड्यात पाहवयास मिळत आहे.

शहापूर तालुक्यातील अजनुप परिसरातील दहा आदिवासी पाड्यांना जोडणारा प्र.जि. मा. 51 ते भाकरीपाडा(उठावा) रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली. सदर रस्त्याच्या कामाचा ठेका मे.आर. के. सावंत कंट्रक्शन, नाशिक या कंपनीला देण्यात आला. सदर ठेकेदाराने 28 नोव्हेंबर 2018 मध्ये कामास सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 15 दिवस काम करून सदर काम बंद करण्यात आले, या रस्त्याचा काम पूर्ण करण्याचा कालावधी हा 9 महिन्यांचा होता परंतु आता पर्यंत 2 वर्ष  उलटून गेले तरी हे काम बंद होते.

येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊनही या कामाला सुरुवात होत नसल्याने आंदोलनाचा इशारा देताच ठेकेदाराने काम सुरु केले. परंतु रस्त्याची कामे 30 मे नंतर बंद केली जातात. मात्र या ठेकेदाराने भर पावसात हे कामे सुरु केलीत , या कामाचे स्वरूप रस्त्याची  लांबी 6.450 किलो मीटर आहे यात 11 मोऱ्या, 900 मीटर काँक्रीटीकरन  रस्ता, 5.550 किलो मीटर डांबरीकरण रस्त्याचा समावेश आहे. यात 75 मी.मी. खडीचा थर देऊन पाणी मिश्रित दबाई करणे, एम. पी.एम. चा थर 50 मी.मी. तसेच कारपेट, सिलकोट, 20 मी.मी. यानुसार काम करावयाचे असून यातील अंदाज पत्रकानुसार कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही आणि जे काम केले, तेदेखील अतिशय निकृष्ट दर्जाचे. शिवाय ठिकठिकाणी मोऱ्या खोदून ठेवल्याने रस्ता देखील बंद होण्याच्या मार्गांवर आहेच. यामुळे अजनुप, वारलीपाडा, कोळीपाडा, भाकरेपाडा, मेंगाळपाडा, कटीचापाडा, वारेपाडा, बोंडारपाडा, भस्मेपाडा, उठावा, येथील आदिवासी ग्रामस्थांना माळरानातून वाट काढत रोज  बाजारपेठ तसंच आपला पाडा गाठावा लागत आहे. एखाद्या आजारी रुग्णास डोली करून आणावे लागते.

दरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदारकडून अनेक काम निकृष्ट दर्जाची केली जातात  व वेळेत करीत नसताना सरकारी बाबू यांच्यावर का मेहेरबान असतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितिला ठेकेदार व  प्रशासकीय अधिकारी यांची असलेली अभद्र युती व स्थानिक आजी माजी  लोकप्रतिनिधी यांनी केलेले दुर्लक्षच कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया येथील आदिवासी ग्रामस्थांची आहे.

ठेकेदाराची चालबाजी

दरम्यान संबंधित रस्ता तयार करणारा ठेकेदार दोन अडीच वर्षापासून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरु करतो व थोडे फार बेगडी काम करून बिल काढण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे या वर्षी देखील 10 आदिवासी गांव पाड्यांना डांबरी रस्त्या पासून वंचित राहून जीवघेण्या समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.

सद्या सुरु असलेल्या कामात बालमजूर!

दुसरीकडे, भर पावसात सुरू असलेल्या रस्ता कामात मजुरी वाचवण्यासाठी आर. के. सावंत कंपनी चा ठेकेदार कामात बालमजूरांचा वापर करीत आहेत. वय वर्ष 10 ते 14 या वयाची लहान मुले या रस्त्यावर खडी, डांबर चे कामे करीत आहेत.या ठेकेदारावर व संबंधित खात्याचे अधिकारी, अभियंता यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता उत्तम निकम यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :thaneठाणे