शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कसारा: ग्रामसडक योजनेचे भर पावसात सुरु, रस्त्याच्या कामासाठी बालमजुरांचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 17:14 IST

लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षमुळे चांगल्या योजनांना हरताळ फासल्याचे चित्र सद्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गांव पाड्यात पाहवयास मिळत आहे.

- शाम धुमाळ

कसारा: विकासापासून दूर असलेल्या आदिवासी पाड्यांची प्रगती व्हावी म्हणून प्रथम दळणवळणाची सोय उत्तम दर्जाची करण्याचा मानस शासनाचा असून त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात करण्यात आली यामुळे गाव-पाड्यात दळणवळणाची सुविधा होईल व  या मागास भागाचा शहरी परिसराशी संपर्क येऊन या गाव-पाड्यांचा  विकास होईल या उद्दात्त हेतूने शासनाने सुरू केलेल्या या योजनेला काही भ्रष्ट ठेकेदार व प्राशसनातील अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षमुळे चांगल्या योजनांना हरताळ फासल्याचे चित्र सद्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गांव पाड्यात पाहवयास मिळत आहे.

शहापूर तालुक्यातील अजनुप परिसरातील दहा आदिवासी पाड्यांना जोडणारा प्र.जि. मा. 51 ते भाकरीपाडा(उठावा) रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली. सदर रस्त्याच्या कामाचा ठेका मे.आर. के. सावंत कंट्रक्शन, नाशिक या कंपनीला देण्यात आला. सदर ठेकेदाराने 28 नोव्हेंबर 2018 मध्ये कामास सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 15 दिवस काम करून सदर काम बंद करण्यात आले, या रस्त्याचा काम पूर्ण करण्याचा कालावधी हा 9 महिन्यांचा होता परंतु आता पर्यंत 2 वर्ष  उलटून गेले तरी हे काम बंद होते.

येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊनही या कामाला सुरुवात होत नसल्याने आंदोलनाचा इशारा देताच ठेकेदाराने काम सुरु केले. परंतु रस्त्याची कामे 30 मे नंतर बंद केली जातात. मात्र या ठेकेदाराने भर पावसात हे कामे सुरु केलीत , या कामाचे स्वरूप रस्त्याची  लांबी 6.450 किलो मीटर आहे यात 11 मोऱ्या, 900 मीटर काँक्रीटीकरन  रस्ता, 5.550 किलो मीटर डांबरीकरण रस्त्याचा समावेश आहे. यात 75 मी.मी. खडीचा थर देऊन पाणी मिश्रित दबाई करणे, एम. पी.एम. चा थर 50 मी.मी. तसेच कारपेट, सिलकोट, 20 मी.मी. यानुसार काम करावयाचे असून यातील अंदाज पत्रकानुसार कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही आणि जे काम केले, तेदेखील अतिशय निकृष्ट दर्जाचे. शिवाय ठिकठिकाणी मोऱ्या खोदून ठेवल्याने रस्ता देखील बंद होण्याच्या मार्गांवर आहेच. यामुळे अजनुप, वारलीपाडा, कोळीपाडा, भाकरेपाडा, मेंगाळपाडा, कटीचापाडा, वारेपाडा, बोंडारपाडा, भस्मेपाडा, उठावा, येथील आदिवासी ग्रामस्थांना माळरानातून वाट काढत रोज  बाजारपेठ तसंच आपला पाडा गाठावा लागत आहे. एखाद्या आजारी रुग्णास डोली करून आणावे लागते.

दरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदारकडून अनेक काम निकृष्ट दर्जाची केली जातात  व वेळेत करीत नसताना सरकारी बाबू यांच्यावर का मेहेरबान असतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितिला ठेकेदार व  प्रशासकीय अधिकारी यांची असलेली अभद्र युती व स्थानिक आजी माजी  लोकप्रतिनिधी यांनी केलेले दुर्लक्षच कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया येथील आदिवासी ग्रामस्थांची आहे.

ठेकेदाराची चालबाजी

दरम्यान संबंधित रस्ता तयार करणारा ठेकेदार दोन अडीच वर्षापासून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरु करतो व थोडे फार बेगडी काम करून बिल काढण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे या वर्षी देखील 10 आदिवासी गांव पाड्यांना डांबरी रस्त्या पासून वंचित राहून जीवघेण्या समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.

सद्या सुरु असलेल्या कामात बालमजूर!

दुसरीकडे, भर पावसात सुरू असलेल्या रस्ता कामात मजुरी वाचवण्यासाठी आर. के. सावंत कंपनी चा ठेकेदार कामात बालमजूरांचा वापर करीत आहेत. वय वर्ष 10 ते 14 या वयाची लहान मुले या रस्त्यावर खडी, डांबर चे कामे करीत आहेत.या ठेकेदारावर व संबंधित खात्याचे अधिकारी, अभियंता यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता उत्तम निकम यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :thaneठाणे