शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

यंदाच्या वर्षात मुंबईतले रस्ते अपघात घटले

By admin | Updated: September 5, 2014 01:27 IST

बेदरकार वाहनांमुळे किंवा अन्य कारणांमुळे रस्ते अपघाताचा धोका संभवू शकतो, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून सातत्याने केले जाते.

मुंबई : मुंबईकरांनो रस्त्यावरून वाहन चालवताना किंवा चालताना जरा जपून. बेदरकार वाहनांमुळे किंवा अन्य कारणांमुळे रस्ते अपघाताचा धोका संभवू शकतो, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून सातत्याने केले जाते. मात्र वाहतूक पोलिसांच्या जनजागृतीमुळे यंदाच्या वर्षात मुंबईतील रस्ते अपघाताचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 418 अपघात कमी झाले आहेत. 
मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने, बेदरकारपणो वाहन चालवणो किंवा रस्त्यांवरील खड्डे या आणि अशा अन्य कारणांमुळे मुंबईतील रस्त्यांवर अपघात बरेच वाढले होते. त्यामुळे रस्त्यांवरुन चालणोही कठीण होऊन बसले होते. हे पाहता वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अपघात कमी होण्यासाठी जनजागृती करण्यावर अधिक भर दिला. तसेच अपघात कमी होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये अपघात झालेल्या ठिकाणांची माहिती संकलित करुन अपघात होण्याची कारणो, वेळ आणि ठिकाण यांचा अभ्यास करुन यासंदर्भात अधिका:यांच्या बैठका घेऊन त्याचा आढावा घेतला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये वाहतूक नियमनासाठी अधिक मनुष्यबळ नेमण्यात आले. 
तसेच रस्त्यांवर अनेक ठिकाणी सूचना फलक, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी मोहीम आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली. त्याचा फायदा होत यंदाच्या वर्षातील सात महिन्यांत रस्ते अपघातात घट झाली. (प्रतिनिधी)
 
 जानेवारी ते जुलै 2014 मध्ये 309 प्राणांतिक अपघात झाले होते. मागील वर्षीच्या याच महिन्यात 332 प्राणांतिक अपघात झाले. 2014 मधील सात महिन्यांत 12 हजार 836 अन्य अपघात झाले असून मागील वर्षी याच कालावधीत 13 हजार 231 अपघात झाल्याचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) बी.के. उपाध्याय यांनी सांगितले. 
 
विभागप्राणांतिकअन्य
अपघातअपघात
कुलाबा3579
काळबादेवी194
पायधुनी10148
ताडदेव4559
वडाळा10139
नागपाडा3166
भायखळा9235
भोईवाडा3239
वरळी7430
माहीम11501
माटुंगा16754
चेंबूर18563
ट्रॉम्बे33639
विभागप्राणांतिकअन्य
अपघातअपघात
घाटकोपर20533
विक्रोळी22647
मुलुंड7313
साकीनाका11529
वांद्रे6678
डी.एन.नगर5773
वाकोला301057
एअरपोर्ट6675
गोरेगाव241270
मालाड6231
कांदिवली18489
बोरीवली26 595