शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

रायगडावर पुन्हा शेकाप

By admin | Updated: February 24, 2017 04:29 IST

अत्यंत चुरशीच्या अशा रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत अखेर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील

अलिबाग : अत्यंत चुरशीच्या अशा रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत अखेर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांची संयुक्त राजकीय खेळी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. शेकाप-राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता रायगड जिल्हा परिषदेत येणार हे स्पष्ट झाले आहे.आ. सुनील तटकरे आणि आ.जयंत पाटील यांनी आपल्याच कुटुंबीयांना तिकिटे देऊन निष्ठावंतांवर अन्यय केला, असा आरोप करीत अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. अलिबाग तालुक्यांत तर राष्ट्रवादी संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी बाजी शेकाप-राष्ट्रवादीनेच मारली आहे.सेना-भाजपा फूटीनंतर सेना आणि काँग्रेस अशी युती झाली. काँग्रेसच्या वरिष्ठांचे आदेश झुगारून केवळ सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांना शह देण्याकरीता सेना-काँग्रेस अशी युती झाली, परंतु सेना व काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना ती रुचली नाही.शेकाप-राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यावर शिवसेना हा मोठा विरोधी पक्ष राहाणार आहे. अल्पमतातल्या भाजपा आणि काँग्रेसला अपरिहार्यतेने विरोधीपक्षातच बसावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या आदिती सुनील तटकरे जि.प.अध्यक्षपदी विराजमान होण्याचे संकेत आहेत.रायगडपक्षजागाभाजपा०३शिवसेना१७काँग्रेस०३राष्ट्रवादी१२शेकाप२४