शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भगवान गडावरील मेळाव्याबद्दल योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊ- पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:23 IST

भगवान गडावरील मेळाव्याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे

ठळक मुद्देभगवान गडावरील मेळाव्याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे.

परळी- भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत. भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबतची आज माझी भूमिका स्पष्ट नाही, एकीकडे हजारो श्रद्धाळूंची भावना तर दुसरीकडे श्रद्धास्थान भगवान गड आहे, त्यामुळे याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. पंकजा मुंडे परळीत बोलत होत्या.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 व्या गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे परळीत आल्या होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना आपण ' योग्य वेळी, योग्य निर्णय' घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी  कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मुंडे यांचे भाषण झाले, परंतु त्यांनी यावेळी मेळाव्यावर बोलायचं टाळलं.

भगवानगड दसरा मेळाव्यावरून समर्थकांमध्ये वादभगवानगडावर दसरा मेळावा घेण्यावरून मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. याबाबत त्यांच्या समर्थकांनी परस्परविरोधी निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. श्रीक्षेत्र भगवानगडावर अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो. वंजारी समाजाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळे ३० सप्टेंबरला दसरा मेळावा गडावर घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बुलढाणा व वाशिम जिल्हा कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गड ताब्यात घेऊन दसरा मेळाव्यास विरोध केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजीही करण्यात आली.महंत नामदेवशास्त्री सानप यांच्या समर्थक असलेल्या शेवगाव तालुक्यातील राणेगाव व शिंगोरी येथील ग्रामस्थांनी शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना बुधवारी निवेदन दिले. श्री क्षेत्र भगवानगड हे स्थान राजकारणविरहित आहे. त्याचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने दसऱ्याच्या दिवशी येथे कुठल्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे