शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

निर्यात थांबल्याने तांदळाचे भाव गडगडले; इराणकडून खरेदी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 06:03 IST

पावसामुळे तांदळाची ‘बंपर’ आवक

विजयकुमार सैतवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : इराणकडून भारत कच्च्या तेलाची (क्रूड आॅईल) खरेदी करीत नसल्याने इराणनेही भारतीय तांदळाची खरेदी थांबविली आहे. त्यामुळे भारतातून तांदळाची निर्यात होत नसल्याने व त्यात यंदा अतिपावसामुळे तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा त्याचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी गडगडले आहे. यात बासमती तांदळाचे भाव ५० ते ७५ रुपये प्रती किलोवर आले आहेत.

भारतातून इराण, नेपाळ, मलेशिया, दुबईसह अफ्रिकी देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते. या निर्यात होणाऱ्या तांदळापैकी ५० टक्के (दरवर्षी तब्बल ८ ते १० लाख टन) तांदळाची निर्यात एकट्या इराणमध्ये होते. भारतीय तांदळाचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या इराणकडून भारताने सध्या कच्च्या तेलाची (क्रूड आॅईल) खरेदी थांबविली आहे. कच्च्या तेलाच्या बदल्यात इराण भारताकडून तांदूळ घेतो. कच्च्या तेलाची खरेदीच होत नसल्याने इराणनेही भारतीय तांदूळ खरेदीला नकार दिला आहे.

मध्यमवर्गीयांच्या घरीही दरवळणार ‘बासमती’चा सुगंधचिनोर, कालीमूछ, सुगंधी मसुरी, कोलम अशा दर्जाच्या अथवा त्याही पेक्षा कमी भावाच्या तांदळाची खरेदी करणाºया मध्यमवर्गीय ग्राहकांच्याही घरी बासमती तांदुळाचा सुगंध दरवळू शकतो, असे चित्र यंदा निर्माण झाले आहे. एरव्ही १०० ते १५० रुपये प्रती किलोने विक्री होणाºया बासमती तांदळाचे भाव सध्या ५० ते ७५ रुपये प्रती किलोवर आले आहेत. या सोबतच ३५ ते ५० रुपये प्रती किलोने विक्री होणाºया चिनोर व इतर तांदुळाचेही भाव ३२ ते ४२ रुपये प्रती किलोवर आले आहेत. दुसरीकडे यंदा चांगल्या पावसामुळे तांदुळाची बंपर आवक झाली आहे.भाव खाली आलेसध्या जळगावच्या बाजारपेठेसह राज्यातही विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसरसह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी भागांतून तांदळाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यात निर्यात थांबल्याने तांदळाचा मोठा साठा देशात उपलब्ध झाला आहे. परिणामी, आवक वाढल्याने तांदळाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी खाली आले आहेत.