शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 04:54 IST

शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला

यवतमाळ : शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला असून त्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीपासून करण्यात येणार आहे. बुधवारी वाघाडी पुनरुज्जीवनाच्या ९८५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पातून नदी काठावरील साडेपाच हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न पाचपट वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.प्रकल्प आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याबाबत काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील वाघाडी ही महत्त्वाची नदी यवतमाळ, कळंब, घाटंजी तालुक्यातून वाहते. पैनगंगेची उपनदी असलेली वाघाडी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यातील चार महिने आणि इतरही काही महिन्यांत ही नदी कोरडी पडते. ती बारमाही वाहती राहावी यासाठी इशा फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी सर्व्हे करून पुनरुज्जीवनाचा आराखडा शासनास सादर केला.ईशा फाउंडेशनचा पुढाकारईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुुदेव यांनी देशभरात ‘रॅली फॉर रिव्हर’ प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गतच वाघाडीचे पुनरुज्जीवनकेले जाणार आहे. त्याचा प्रकल्प आराखडा बुधवारी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर करण्यात आला. शासनाने प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली असून जिल्हा प्रशासनाकडे हा आराखडा पोहोचला आहे.सरकार आणि ‘रॅली फॉर रिव्हर’ने घेतलेल्या या पुढाकाराचे राज्यपालांनी कौतुक केले आणि यवतमाळचा हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी ‘मॉडेल’ ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी कल्याण आणि पर्यावरणरक्षण याविषयी पुरोगामी धोरण ठेवून महाराष्ट्र सरकारने यात दाखविलेल्या तत्परतेची सद््गुरूंनी प्रशंसा केली.सद््गुरूंनी भारतातील नद्यांच्या शोचनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी १६ राज्यांमधून ९,३०० किमीची रॅली काढून ‘रॅली फॉररिव्हर’ मोहीम गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू केली. त्यानंतर त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेचा आराखडा पंतप्रधानांना सादर केला. त्यानंतरज्या सहा राज्यांनी या मोहिमेअंतर्गत नदी पुनरुज्जीवनाचे सामंजस्यकरार केले, त्यात महाराष्ट्र पहिलेराज्य होते.>विजय दर्डा यांचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांना निमंत्रणलोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी गुरुवारी ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांची भेट घेऊन प्रकल्पाबद्दल चर्चा केली. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी आमच्यातर्फे संपूर्ण सहकार्य मिळेल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एकदा यवतमाळला जरूर यावे, त्यांच्या ‘यूथ अ‍ॅण्ड ट्रूथ’ या कार्यक्रमांतर्गत यवतमाळच्या युवकांना मार्गदर्शन करावे, असे निमंत्रणही विजय दर्डा यांनी दिले.>असा राबविला जाणार प्रकल्पवाघाडी नदीच्या काठावर किमान एक किलोमीटर परिसरात झाडांची संख्या वाढविणार.यात प्रामुख्याने फळझाडे लावली जाणारपहिल्या वर्षी प्रकल्पाबाबत नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करणारदुसºया वर्षी ३० टक्के, तिसºया वर्षी ६० टक्के आणि चौथ्या वर्षी १०० टक्के वृक्षलागवड पूर्ण करणार.पाच वर्षांत ६० लाख फळझाडे लावली जाणारनदी काठावरील शेतकºयांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केले जाणारपारंपरिक पिकांपेक्षा फळशेती, सामूहिक शेती करण्यास प्रवृत्त करणारशेतकरी उत्पादन संस्था स्थापन करून फळांची विक्री केली जाणार

टॅग्स :riverनदी