शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

परीक्षा रद्दबाबत पुनर्विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:57 IST

शिक्षणतज्ज्ञांनी मांडली भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय शैक्षणिक अडचणी वाढविणारा, कायदेशीरदृष्ट्या चुकीचा व विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणारा आहे. शासनाने निर्णय जाहीर करण्यास घाई केली असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षातील संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी सर्व गोष्टींना न्याय देऊन शिस्तबद्ध पद्धतीने तोंडी परीक्षा घेण्याबाबत शासनाने चाचपणी करावी,अशी विनंतीवजा सूचना शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, शासनाचा परीक्षा रद्द करण्याचा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणारा आहे. परीक्षा घेण्याचा अधिकार विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळांचा असल्याने शासनाने त्या-त्या विद्यापीठाला परीक्षांबाबत निर्णय घेण्याचे आधिकार देणे अपेक्षित आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, सरासरी गुण देण्याच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ होणार आहेत. परीक्षा न घेतल्याने काही विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क परत मागितले जाऊ शकते. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा.अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता प्रदान केलेल्या पदवीच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतील. विद्यापीठ अनुदान आयोगासह इतर संस्था अशा पदवीला मान्यता देतील का? तसेच सरासरी गुणांमुळे पदवीचे महत्त्व कमी होईल. उशिरा परीक्षा घेणे जास्त फायदेशीर, कायदेशीर व संयुक्तिक राहील.- अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी,अधिसभा सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ