शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

परीक्षा रद्दबाबत पुनर्विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:57 IST

शिक्षणतज्ज्ञांनी मांडली भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय शैक्षणिक अडचणी वाढविणारा, कायदेशीरदृष्ट्या चुकीचा व विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणारा आहे. शासनाने निर्णय जाहीर करण्यास घाई केली असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षातील संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी सर्व गोष्टींना न्याय देऊन शिस्तबद्ध पद्धतीने तोंडी परीक्षा घेण्याबाबत शासनाने चाचपणी करावी,अशी विनंतीवजा सूचना शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, शासनाचा परीक्षा रद्द करण्याचा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणारा आहे. परीक्षा घेण्याचा अधिकार विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळांचा असल्याने शासनाने त्या-त्या विद्यापीठाला परीक्षांबाबत निर्णय घेण्याचे आधिकार देणे अपेक्षित आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, सरासरी गुण देण्याच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ होणार आहेत. परीक्षा न घेतल्याने काही विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क परत मागितले जाऊ शकते. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा.अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता प्रदान केलेल्या पदवीच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतील. विद्यापीठ अनुदान आयोगासह इतर संस्था अशा पदवीला मान्यता देतील का? तसेच सरासरी गुणांमुळे पदवीचे महत्त्व कमी होईल. उशिरा परीक्षा घेणे जास्त फायदेशीर, कायदेशीर व संयुक्तिक राहील.- अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी,अधिसभा सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ