शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महाराष्ट्रात बीआरएसची अनपेक्षित मुसंडी; तीन जिल्ह्यांत १६ ग्राम पंचायतींवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:44 IST

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्य़ा ग्रामीण भागात जमीन तयार करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्य़ा ग्रामीण भागात जमीन तयार करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये भंडारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

भंडारा जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध बीआरएस असाच सामना रंगला होता. यापैकी ९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यास बीआरएसला यश आले आहे. तर सोलापूरमध्ये सहा ग्रामपंचायतींवर तेलंगानाच्या या सत्ताधारी पक्षाने सत्ता मिळविली आहे. 

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. याचे आज निकाल हाती येत आहेत. यापैकी १९६९ जागांवर निकाल जाहीर झाले आहेत. ११८९ जागांवर महायुती, तर ४४५ जागांवर मविआ आणि ३३५ जागांवर इतर पक्षांना यश मिळाले आहे. 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक पोटनिवडणुकीसह  33 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. गेवराईमध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी (अजित पवार)गट विजयी झाले आहेत. त्यानंतर इतर ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे(ठाकरे गट)वर्चस्व दिसून आले. दरम्यान, गेवराईमध्ये भारत राष्ट्र समितीने देखील खाते खोलले आहे. रेवती देवकी ही ग्राम पंचायत बीआरएसकडे गेली आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती