शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर लवकरच निर्बंध, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 00:53 IST

government employees : यावर्षी बदल्यांवर सरसकट बंदी आणायची, किमान १५ टक्के बदल्या करायच्या किंवा फक्त विनंती बदल्या करायच्या, अशा तीन पर्यायांवर सामान्य प्रशासन विभाग विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- यदु जोशी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सरसकट बदल्या न करता त्यावर काही बंधने आणली जाणार असून, त्याबाबतचा निर्णय लवकरच सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे.यावर्षी बदल्यांवर सरसकट बंदी आणायची, किमान १५ टक्के बदल्या करायच्या किंवा फक्त विनंती बदल्या करायच्या, अशा तीन पर्यायांवर सामान्य प्रशासन विभाग विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विनंती बदल्यांसाठी प्रत्येक विभागात अनेक अर्ज येतात. त्यांची छाननी करून निकड असलेल्याच बदल्या कराव्यात, अशी सूचना समोर आली आहे.

राज्य शासनाने २००५ मध्ये केलेल्या बदल्यांचा कायद्यानुसार, एका कार्यालयातील जास्तीत जास्त ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या (प्रत्येक संवर्गात) बदल्या करता येऊ शकतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० ऐवजी केवळ १५ टक्केच सर्वसाधारण बदल्या करण्याचे बंधन सामान्य प्रशासन विभागाने घातले होते. बदल्यांमुळे येणारा आर्थिक भार, तसेच कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांबाबत सातत्य राहावे म्हणून हे बंधन आणले होते. यंदाही असेच निर्बंध येण्याची शक्यता आहे.

काही विभागांनी ३० टक्के बदल्या करणार असल्याचे नमूद करत बदल्यांसाठी अर्जही मागविले आहेत. वित्त विभागांतर्गत येणाऱ्या लेखा व कोषागरे संचालनालयाने असे परिपत्रक काढले आहे.

गोंधळाचे वातावरण बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या हालचाली सध्या सुरूझाल्या आहेत. दरवर्षी ३१ मे पर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यात येतात. गेल्यावर्षीचे १५ टक्क्यांचे बंधन यावर्षीही कायम राहणार का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

बदल्यांवर पूर्णपणे निर्बंध आणणे योग्य ठरणार नाही. किमान ज्या विनंती बदल्या आहेत आणि त्यातील ज्या खरेच आवश्यक आहेत त्या करायलाच हव्या.- ग. दि. कुलथे, नेते, राजपत्रित अधिकारी महासंघ.

बदल्यांवर सरसकट बंदी आणणे योग्य नाही. तसे केल्यास बदलीची आत्यंतिक निकड असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल.- विश्वास काटकर, सरचिटणीस,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :TransferबदलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस