शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

"राज ठाकरेंबद्दल आदर, ते जुने शिवसैनिक; एकनाथ शिंदेंचं त्यांच्याशी बोलणं झालं" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:51 IST

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने उद्धव ठाकरेंनाही आनंद झाला असेल. पक्षप्रमुख मुख्यमंत्री होत असल्याने कुणीही नाराज नव्हतं. परंतु हा बदल महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने होतोय असं दीपक केसरकरांनी सांगितले.

गोवा - एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात बोलणं झालेले होतं. राज ठाकरे जुने शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल जो आदर तोच राज ठाकरेंबद्दल आहे. अशा प्रसंगात सगळे एकत्र येतात. ज्या ज्यावेळी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आवाहन करतील तेव्हा सगळे पक्ष एकत्र येतील. कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ते वरच्या पातळीवर पोहचले आहे. वर्षानुवर्षे कामगिरीतून हे संबंध विकसित होतात. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण करणारा खरा शिवसैनिक कसा असतो याचं उदाहरण एकनाथ शिंदे आहेत अशा शब्दात शिंदे गटाचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी कौतुक केले आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकला आहे. मराठी माणसांत निश्चित आनंदाचं वातावरण असेल. आनंदाच्या क्षणी कुणावरही टीका नाही. १०६ पक्षाचे आमदार असताना भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देऊन मोठं मन दाखवलं. अनेक विकासकामे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू झाले. दिल्लीशी त्यांचे संबंध चांगले आहेत. फडणवीस-शिंदे यांचे एकमेकांशी सुसंवाद चांगला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने उद्धव ठाकरेंनाही आनंद झाला असेल. पक्षप्रमुख मुख्यमंत्री होत असल्याने कुणीही नाराज नव्हतं. परंतु हा बदल महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने होतोय. विचारांची ही लढाई होती. महाराष्ट्रात चांगले वातावरण राहील. बाळासाहेब ठाकरेंची जी भूमिका होती. त्याच विचारावर हे सरकार आले आहे. सुरूवातीला हे घडलं असतं तर आनंद झाला असता परंतु उशिरा होईना पण घडलेले आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद एकनाथ शिंदे यांच्यामागे राहील. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण एकत्र आले तर राज्य बलवान होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक बसला एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार दिल्याने आम्ही मंत्रिपदाच्या अपेक्षेने आलो नाही. ६ मंत्री आमच्यासोबत आले ते तत्वासाठी आले. विचारांसाठी आले. एकनाथ शिंदे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. ज्यावेळी कुठेही आपत्ती येते तिथे सर्वात आधी जाणारे नेते एकनाथ शिंदे आहे. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण हे बाळासाहेबांची शिकवण पुढे घेऊन जात आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक बसला आहे असंही केसरकरांनी सांगितले. 

राऊतांनी जनतेच्या पाठित खंजीर खुपसला हा वाद तत्वाचा होता, महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिले त्यांचीच युती झाली आहे. पाठित खंजीर संजय राऊतांनी खुपसला. शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचं काम करतात. जनतेच्या पाठित खंजीर खुपसला. निवडून देणारी जनता असते पक्ष नसतो. जनतेनं जो कौल दिला त्यातून सरकार स्थापन झाले आहे. केंद्र आणि राज्यात वाद लावून द्यायचा हे सकाळच्या पत्रकार परिषदेतून होता. महाराष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संबंध चांगले लागतात असा टोला दीपक केसरकरांनी संजय राऊतांना लगावला. 

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना