शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

अध्यक्षांची किंमत ठेवली नसल्यानेच राजीनामा

By admin | Updated: October 4, 2015 02:57 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले आहे. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत

- प्रसन्न पाध्ये,  पुणेमहाराष्ट्र साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले आहे. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही हे वर्षभरातच जाणवल्याने परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी स्पष्ट केले.साहित्य परिषदेच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांनी कार्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. सभेचे अध्यक्ष या नात्याने निवेदन करीत असताना शेजवलकर यांनी, ‘परिषदेच्या कारभाराचा उबग आल्यामुळेच एक वर्षात राजीनामा दिल्याचे प्रा. मिरासदार यांनी आपल्याला सांगितले होते,’ असा गौप्यस्फोट केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रा. मिरासदार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक असे भांडण नव्हते. उगीच आरोप करायचे म्हणून सांगत नाही तर, पदाधिकाऱ्यांचा कारभारच खटकत होता. त्याची जाहीर वाच्यता केली नाही. म. श्री. दीक्षित, गं. ना. जोगळेकर यांच्याबरोबर काम केले; त्यावेळी परिषदेत साहित्यिक वातावरण होते. ते कायम राहिले नाही असे जाणवल्याने परिषदेतून बाहेर पडलो. शेजवलकर यांनाही असाच अनुभव आला असावा. म्हणूनच त्यांनी भर सभेत पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली असावी, असे त्यांनी सांगितले.साहित्य परिषदेत पाच वर्षांपूर्वी सत्तापरिर्वन झाल्यानंतर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा मिरासदार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यापूर्वीही मिरासदार परिदषेचे अध्यक्ष होते.सिंगापूरला नेण्याचे टाळलेसाहित्य परिषदेच्या परदेशवाऱ्या अनेक वेळा वादग्रस्त ठरल्या. मिरासदार यांनाही याबाबत अनुभव आले. त्यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी यांनी याबाबतच्या काही कटू आठवणी सांगितल्या. मंकणी म्हणाल्या, पहिले विश्वसंमेलन अमेरिकेत झाले त्यावेळी दादा (प्रा. मिरासदार) साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर बोलाविलेच गेले नाही. वास्तविक इतर शाखांचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.सिंगापूरला विश्व साहित्य संमेलन होणार होते, त्यावेळी त्यांना नेण्याचे टाळले. पदाधिकाऱ्यांनीच त्यांची तब्येत बरी नसल्याचे कारण सिंगापूरच्या मंडळाच्या अध्यक्ष राजश्री लेले यांना सांगितले. राजश्री ही दादांची विद्यार्थिनी असल्याने ती भारतात आली, तेव्हा दादांची भेट घेतल्यावर तिला सर्व प्रकार समजला, असे त्या म्हणाल्या.