शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजीनामे मंजूर, आमदारांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:28 IST

भाजप-शिवसेना युतीमुळे नाराज झाल्याने वरोरा-भद्रावतीचे शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते काँग्रेसच्या तिकीटावर चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

मुंबई : विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील चिखलीकर व सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर या तीन बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ६३ वरून ६० वर आले आहे.

भाजप-शिवसेना युतीमुळे नाराज झाल्याने वरोरा-भद्रावतीचे शिवसेनाआमदार सुरेश धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते काँग्रेसच्या तिकीटावर चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना टीकेचे लक्ष्य बनविले होते, तेव्हापासून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे धानोरकर यांच्या संपर्कात होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा, वणी व आर्णी हे पाच विधानसभा मतदारसंघ कुणबीबहुल आहेत. काँग्रेसलाही कुणबी समाजाचा युवा चेहरा हवा होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बंडाचा झेंडा फडकावला असून ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांच्या बंडखोरीमुळे खैरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करणाऱ्या काकासाहेब शिंदेंबाबत सहानुभूती व्यक्त करत जाधव यांनी यापूर्वीही राजीनामा दिला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठ दिली असून ते भाजपकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमधून निवडणूक लढवित आहेत. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चिखलीकरांनी पक्ष आदेश डावलून भाजपला मदत केली होती.राजीनामे मंजूरजाधव, चिखलीकर व धानोरकर यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे तिन्ही विधानसभांच्या जागा रिक्त झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात अहवाल देण्यात आला आहे. केवळ सहा महिने शिल्लक राहिल्याने येथे पोटनिवडणुकीची शक्यता नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदार