शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’; कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 05:55 IST

कृती समितीतर्फे १० सप्टेंबरपासून संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

नागपूर : सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या नेतृत्वात सोमवारी निघालेल्या हजारोंच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चात ओबीसींच्या विविध संस्था, संघटनांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी सहभागी होत ओबीसीचा नारा बुलंद केला. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये व ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अशी मागणी करीत सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 

कृती समितीतर्फे १० सप्टेंबरपासून संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. दोन दिवसांनी आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोेषणामध्ये झाले. नवव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.  पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.  

गोंदियात जनआक्रोश आंदोलनाने वेधले लक्षओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तसेच समाजातील प्रलंबित समस्या या मुख्य मागण्यांना घेऊन सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने सोमवारी गोंदियात स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते. जिल्ह्यात निघणाऱ्या विविध पदभरतीमध्ये ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

‘कुणबी प्रमाणपत्र देऊ नका!’गडचिराेली : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, या मुख्य मागणीला घेऊन कुणबी व ओबीसी समाजाच्या वतीने साेमवारी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले. ५ ऑक्टोबरला कुणबी व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

‘आरक्षण मर्यादा वाढवा’मुंबई : काँग्रेस कार्यसमितीच्या हैदराबाद येथील बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आरक्षणावरील ५० टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी देखील घेतली होती.

चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ११ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली व तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र टोंगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. टोंगे यांचे उपोषण सुरू झाल्यापासून त्यांची भेट घेणारे शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुनगंटीवार हे पहिले मंत्री होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण