शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

फळमाशी नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठात संशोधन

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

गुणात्मक निर्बंध कायम : परदेशातील बंधने उठली; तरीही हापूसची वाटचाल बिकटच

रत्नागिरी : युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, यावर्षी बंदी उठवली तरी गुणात्मक निर्बंध घालण्यात आले आहेत. फळमाशीमुळे आलेल्या निर्बंधावर पर्याय म्हणून आंब्यावर उष्णजल प्रक्रियेसंबंधी कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. अरब राष्ट्रांसाठी निर्यातीकरिता किचकट प्रणाली नाही. मात्र, अमेरिकेसाठी किरणोत्सार, तर जपानसाठी व्हेपर ट्रीटमेंटचा अवलंब केला जातो. युरोपीय देशांनी फळमाशीचे कारण देत गतवर्षी आंबा नाकारला होता. यावर्षी निर्यातबंदी उठवली तरी, फळमाशीविरहीत आंब्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उष्णजलप्रक्रिया योग्य असल्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. मात्र, हापूसवर संबंधित प्रक्रिया केल्यानंतर त्याचा दर्जा व अन्य गुणधर्म टिकून राहतील का ? याबाबत विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे.आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळी मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापूरी, केशर सारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादूर्भाव होतो. परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे.विद्यापीठाने पेरू आणून पेरू पिकवण्यासाठी ठेवले आहेत. पेरू अति पिकून सडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर त्यामध्ये अळयाची निर्मिती होते. सध्या, आंबा किरकोळ स्वरूपात आहे. मार्चपासून जिल्हाभरातून आंबा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंब्यावर फळमाशीचा होणारा परिणाम त्यासाठी आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया व त्याचे परिणाम याबाबत कोकण कृषी विद्यापिठातर्फे संशोधन सुरू करण्यात आले आहे. याबाबत योग्य निष्कर्ष प्राप्त झालेनंतरच अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघणार आहे. (प्रतिनिधी)हापूसने गेल्या काही वर्षांत केवळ देशातीलच नव्हे; तर परदेशातील बाजारपेठेतही आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. असे असताना दुसरीकडे विविध अटींमुळे युरोपीयन देशांकडून हापूस नाकारला जात आहे. गेल्यावर्षी युरोपीयन देशांनी हापूस घेण्यास नकार दिल्याने हापूसच्या परदेशवारीवर संकट आले होते. फळमाशीचे कारण देत हापूस नाकारण्यात आला होता. पर्याय म्हणून आंब्यावर उष्णजल प्रक्रियेसंबंधी कोकण कृषी विद्यापीठात संशोधन केले जात आहे. त्याला यश आल्यास फळमाशीची समस्या कायम मिटू शकेल.४२ लाख रूपयांमधून करणार विविध विकास कामे.अमेरिकेसाठी हापूस पाठवताना करावा लागतो किरणोत्सार; तर जपानसाठी व्हेपर ट्रीटमेंटचा अवलंब.युरोपीय देशांनी गतवर्षी फळमाशीचे कारण देत नाकारला होता हापूस.निर्यातबंदी उठवली तरी फळमाशीविरहीत आंब्यासाठीचे निर्बंध जारीच.उष्णजलप्रक्रियेचा पर्याय योग्य ?