शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणातून सर्वपक्षीय मार्ग काढण्याची मोदींना विनंती

By admin | Updated: October 14, 2016 01:44 IST

मराठा समाजास नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारलाच सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी भेटून सांगितले

- शरद पवार यांची खास ‘लोकमत’शी चर्चा : गांभीर्याने विचार करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन; केंद्र सरकारलाच घालावे लागेल लक्ष- सुरेश भटेवरा / नवी दिल्लीमराठा समाजास नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारलाच सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी भेटून सांगितले व त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अघ्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पवार म्हणाले की, ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणात मराठा समाजाने कधीही वाटा मागीतलेला नाही. फक्त शैक्षणिक संधीत आणि नोकऱ्यांमधे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे, इतकीच त्यांची मागणी आहे. मराठा समाजातील गरीब कुटुंबांना शैक्षणिक क्षेत्रात सवलती मिळाल्या तर त्याचा थोडाफार भार सरकारी तिजोरीवर पडेल. त्यांनी असेही सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे तर तो निर्णय अर्थातच राज्यस्तरावर होणार नाही. घटनादुरूस्तीशी संबंधित हा विषय असल्याने केंद्र सरकारलाच त्यात लक्ष घालावे लागेल. संसदेत या विषयाची चर्चा घडवण्यापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेतल्यास उचित मार्ग काढता येईल, असे मी पंतप्रधानांच्या कानावर घातले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत, शिस्तीत व शांततेत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चांचे नेतृत्व कोणाकडेही नव्हते, त्यामुळे त्याला कोणताही राजकीय रंग चढवणे उचित नाही, असे करून पवार म्हणाले, वर्षानुवर्षे तोट्याची जिरायत शेती करणाऱ्या बहुसंख्य ग्रामीण शेतकरी कुटुंबाची अस्वस्थता या मोर्चातून व्यक्त झाली आहे. त्यामागची त्यांची भावना समजावून घेणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे समर्थन करताना पवार म्हणाले की, राज्यात सुमारे दोन कोटींची लोकसंख्या गरीब मराठा समाजाची राजकीय क्षेत्रातील मराठा समाजाच्या नेत्यांशी अथवा सधन मराठा कुटुंबांशी तुलना करणे योग्य नाही. मराठा समाजातीला बराच मोठा वर्ग ग्रामीण भागात निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीवर कशीबशी गुजराण करतो आहे. राज्यक र्ते कोणत्याही पक्षाचे असले तरीत्यांना त्यांच्या अस्वस्थतेची दखल घ्यावीच लागणार आहे.