शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

मराठा आरक्षणातून सर्वपक्षीय मार्ग काढण्याची मोदींना विनंती

By admin | Updated: October 14, 2016 01:44 IST

मराठा समाजास नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारलाच सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी भेटून सांगितले

- शरद पवार यांची खास ‘लोकमत’शी चर्चा : गांभीर्याने विचार करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन; केंद्र सरकारलाच घालावे लागेल लक्ष- सुरेश भटेवरा / नवी दिल्लीमराठा समाजास नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारलाच सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी भेटून सांगितले व त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अघ्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पवार म्हणाले की, ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणात मराठा समाजाने कधीही वाटा मागीतलेला नाही. फक्त शैक्षणिक संधीत आणि नोकऱ्यांमधे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे, इतकीच त्यांची मागणी आहे. मराठा समाजातील गरीब कुटुंबांना शैक्षणिक क्षेत्रात सवलती मिळाल्या तर त्याचा थोडाफार भार सरकारी तिजोरीवर पडेल. त्यांनी असेही सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे तर तो निर्णय अर्थातच राज्यस्तरावर होणार नाही. घटनादुरूस्तीशी संबंधित हा विषय असल्याने केंद्र सरकारलाच त्यात लक्ष घालावे लागेल. संसदेत या विषयाची चर्चा घडवण्यापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेतल्यास उचित मार्ग काढता येईल, असे मी पंतप्रधानांच्या कानावर घातले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत, शिस्तीत व शांततेत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चांचे नेतृत्व कोणाकडेही नव्हते, त्यामुळे त्याला कोणताही राजकीय रंग चढवणे उचित नाही, असे करून पवार म्हणाले, वर्षानुवर्षे तोट्याची जिरायत शेती करणाऱ्या बहुसंख्य ग्रामीण शेतकरी कुटुंबाची अस्वस्थता या मोर्चातून व्यक्त झाली आहे. त्यामागची त्यांची भावना समजावून घेणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे समर्थन करताना पवार म्हणाले की, राज्यात सुमारे दोन कोटींची लोकसंख्या गरीब मराठा समाजाची राजकीय क्षेत्रातील मराठा समाजाच्या नेत्यांशी अथवा सधन मराठा कुटुंबांशी तुलना करणे योग्य नाही. मराठा समाजातीला बराच मोठा वर्ग ग्रामीण भागात निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीवर कशीबशी गुजराण करतो आहे. राज्यक र्ते कोणत्याही पक्षाचे असले तरीत्यांना त्यांच्या अस्वस्थतेची दखल घ्यावीच लागणार आहे.