शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
3
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
4
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
5
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
6
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
7
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
8
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
9
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
10
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
11
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
13
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
14
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
15
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
16
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
17
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
18
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
19
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
20
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय

मराठवाड्यात पंकजा आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:59 IST

विधान परिषद निवडणूक; सहा जागांचे गुरुवारी निकाल

मुंबई : मराठवाड्यातील उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस व आघाडी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत होत आहे़ या लढतीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे़बीड जिल्ह्यातील अपात्र ठरविण्यात आलेल्या ११ नगरसेवकांना निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी पात्र ठरविले आहे़ यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली़ सुनावणीअंती न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ती मते तूर्त ग्राह्य धरली जावू नयेत, असे निर्देश दिले आहेत़ दोन्ही उमेदवारांच्या मतातील अंतर ११ पेक्षा कमी होत असेल, तर त्यांची मते ग्राह्य धरायची किंवा नाही, याबाबत न्यायालयाकडून निर्देश मिळाल्यानंतरच कार्यवाही होईल़ मतमोजणी संपेपर्यंत निर्देश न आल्यास निकाल राखीव ठेवावा लागेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़राधाकृष्ण गमे यांनी दिली़परभणी-हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश देशमुख व शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधापरिषद मतदारसंघासाठी १००५ पैकी १००४ मतदारांनी आपला हक्क बजावला़ बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील केंद्रावर एक मतदार अनुपस्थित राहिला़ लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या केंद्रावर एका मतदाराने मतपत्रिका उघडपणे दाखवून गोपनीयतेचा भंग केला आहे़अमरावतीत १०० टक्के मतदानअमरावती/चंद्रपूर : अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजतापर्यंत अनुक्रमे १०० आणि ९९.७२ टक्के मतदान झाले. यामध्ये सहा उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले.चंद्रपूर-वर्धेत दावे-प्रतिदावेचंद्रपूर-वर्धा-गडचिरोलीमध्ये भाजपाचे रामदास आंबटकर आणि काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांच्यात मुख्य लढत असून जगदीश टावरी आणि सौरभ तिमांडे हे दोन अपक्षही रिंगणात आहेत. येथे भाजपाचे पारडे जड असले तरी काँग्रेसनेही विजयाचा दावा केला आहे.अमरावतीत थेट सामनाअमरावती मतदारसंघात राज्यमंत्री भाजपाचे प्रवीण पोटे व काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात सरळ सामना आहे. या निवडणुकीसाठी ४८९ मतदार होते. मात्र, भातकुली येथील एका नगरसेविकेच्या विरोधात नागपूर उच्च न्यायालयाने जात वैधतेसंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांना न्यायालयीन निर्देशाने यादीत नाव असतानादेखील मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक