शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘२६/११’तील जाँबाज अधिकाऱ्यांचा गौरव

By admin | Updated: August 26, 2015 02:18 IST

‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले

मुंबई : ‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक व पोलीस शौर्यपदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृह विभागाच्यावतीने राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ आॅगस्ट २०१३ रोजी पदक जाहीर झाले होते. त्याचे वितरण करण्यात आले.२६ नोव्हेंबर २००८ रोजी ताज हॉटेलमध्ये शिरलेल्या अतिरेक्यांशी मुकाबला करणारे परिमंडळ -१ चे उपायुक्त आणि सध्या औरंगाबाद येथे विशेष पोलिस निरीक्षक असलेले विश्वास नांगरे-पाटील ,राजवर्धन (सहआयुक्त, नागपूर), दीपक ढोले (साहाय्यक आयुक्त, पाचपावली, नागपूर), साहाय्यक निरीक्षक नितीन काकडे, हवालदार अरुण माने, सौदागर शिंदे, अमित खेतले व पवार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. त्यांच्यासह ५० जणांचा गौरव करण्यात आले. परदेशी सुकोजी देवांगण, पोलीस हवालदार गडचिरोली (मरणोत्तर), गोविंद बाली फरकाडे, पोलीस नाईक गडचिरोली (मरणोत्तर) व मुन्शी चिक्कू पुंगाटी, पोलीस शिपाई गडचिरोली (मरणोत्तर) यांना जाहीर झालेले पोलीस शौर्यपदक त्यांच्या नातलगांनी स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री सर्वश्री डा़ॅ़ रणजीत देशमुख (शहर) व राम शिंदे (ग्रामीण), अपर मुख्य सचिव (गृह) के़ पी़ बक्षी, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारीया उपस्थित होते. समारंभाला इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी तसेच गौरविण्यात येणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धाडसी कामगिरी बजावलेल्या ५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज भवनातील दरबार हॉल येथे आयोजित समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.