शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजपच्या पराभवाचा अहवाल गुंडाळला, अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:33 IST

फेब्रुवारीत या मतदारसंघात पाटील यांचा काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला.

मुंबई : अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीच्या अहवालावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावेळचे पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी हा अहवाल दिला होता. 

पाटील यांनी या मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते.  तथापि, चालूवर्षी फेब्रुवारीत या मतदारसंघात पाटील यांचा काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला. या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच जाहीर केले. त्यानुसार पराभवाची कारणे शोधण्यासाठी सुनील कर्जतकर यांना जबाबदारी देण्यात आली.

कर्जतकर यांनी काही आमदार, नेत्यांशी मुंबईत चर्चा केली. नंतर अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी अनेक जणांची मते जाणून घेतली. 

पक्षातील नेत्यांनीच केले पराभूत?पाटील यांना भाजपमधीलच काही नेत्यांनी पराभूत केले. ते निवडून आले तर पुन्हा मंत्री होऊन आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे मंत्रिपदाच्या काही इच्छुकांना वाटले आणि त्यांनी छुप्या कारवाया केल्या, अशी चर्चा त्यावेळी होती. 

अहवाल दिला; पुढे काय?खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, अडीच महिन्यांपूर्वी कर्जतकर यांनी त्यांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे दिला. अहवालात पराभवासाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती विशद केली होती. मात्र, पराभवासाठी अमुकच नेते जबाबदार असल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, त्यांनी जी वस्तुस्थिती मांडली त्यावरून पराभवाचे सूत्रधार कोण हे लगेच लक्षात येण्यासारखे होते. मात्र, या अहवालावर भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वा पक्षात कोणत्याही पातळीवर पुढे चर्चा झाली नाही.

टॅग्स :BJPभाजपा