शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

मे पर्यंत १०९ किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवा, शासनाचे आदेश; विशाळगड प्रकरणावरून बोध

By समीर देशपांडे | Updated: January 22, 2025 17:21 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती

समीर देशपांडेकोल्हापूर : गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची समिती नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. येत्या १० दिवसांत राज्यातील १०९ किल्ल्यांवरील किल्लानिहाय अतिक्रमणांची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मे अखेरपर्यंत ही अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे त्यावरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणे, वास्तू सौंदर्यास, रम्यतेस बाधा येणे अशा बाबी होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही समिती स्थापन करण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागरी भागाकरिता पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, उपवनसंरक्षक, पुरातत्त्वचे सहायक संचालक, प्रादेशिक बंदर अधिकारी हे सदस्य असून निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत. दरमहिन्याला या समितीने बैठक घ्यावयाची आहे.

केंद्र संरक्षित किल्ले ४७राज्य संरक्षित किल्ले ६२

वेळापत्रक३१ जानेवारी २०२५ पर्यंत अतिक्रमणे निश्चित करणे१ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मे २०२५ पर्यंत अतिक्रमणे हटवणे

विशाळगड प्रकरणावरून बोधकोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणांवरून विषय तापला होता. त्यातूनच गेल्या वर्षी अनेक अतिक्रमणे जमावाने उद्ध्वस्त केली होती. हा विषय राष्ट्रीय पातळीवर गाजला होता. यावरूनच शासनाने धडा घेऊन आता हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

शासनाने हा अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी संपर्क नसल्यामुळे आणि काही ठिकाणी ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्यामुळे किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. परंतु शासनाने आता मुदतच घालून दिल्याने योग्य अंमलबजावणी झाली तर राज्यातील महत्त्वाचे किल्ले अतिक्रमणमुक्त होतील. - प्रमोद पाटील, माजी सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडGovernmentसरकार