शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मे पर्यंत १०९ किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवा, शासनाचे आदेश; विशाळगड प्रकरणावरून बोध

By समीर देशपांडे | Updated: January 22, 2025 17:21 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती

समीर देशपांडेकोल्हापूर : गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची समिती नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. येत्या १० दिवसांत राज्यातील १०९ किल्ल्यांवरील किल्लानिहाय अतिक्रमणांची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मे अखेरपर्यंत ही अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे त्यावरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणे, वास्तू सौंदर्यास, रम्यतेस बाधा येणे अशा बाबी होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही समिती स्थापन करण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागरी भागाकरिता पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, उपवनसंरक्षक, पुरातत्त्वचे सहायक संचालक, प्रादेशिक बंदर अधिकारी हे सदस्य असून निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत. दरमहिन्याला या समितीने बैठक घ्यावयाची आहे.

केंद्र संरक्षित किल्ले ४७राज्य संरक्षित किल्ले ६२

वेळापत्रक३१ जानेवारी २०२५ पर्यंत अतिक्रमणे निश्चित करणे१ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मे २०२५ पर्यंत अतिक्रमणे हटवणे

विशाळगड प्रकरणावरून बोधकोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणांवरून विषय तापला होता. त्यातूनच गेल्या वर्षी अनेक अतिक्रमणे जमावाने उद्ध्वस्त केली होती. हा विषय राष्ट्रीय पातळीवर गाजला होता. यावरूनच शासनाने धडा घेऊन आता हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

शासनाने हा अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी संपर्क नसल्यामुळे आणि काही ठिकाणी ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्यामुळे किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. परंतु शासनाने आता मुदतच घालून दिल्याने योग्य अंमलबजावणी झाली तर राज्यातील महत्त्वाचे किल्ले अतिक्रमणमुक्त होतील. - प्रमोद पाटील, माजी सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडGovernmentसरकार