शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir Injection : राज्यात दिवसाला ५० हजार रेमडेसिविरची गरज; ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:17 IST

Remdesivir Injection : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे.

मुंबई : राज्यात दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असून, तेवढ्या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे, तर मुंबईत सध्या दिवसाला तीन ते अडीच हजार रेमडेसिविर व्हायल्सची गरज भासत आहे,  पालिका रेमडेसिविर खरेदीसाठी कोणत्याही अन्य यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः खरेदी करत आहे. पालिकेच्या या पूर्वनियाेजनामुळे पालिका रुग्णालयात रेमडेसिविरचा कधीच तुटवडा भासत नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने दिली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे. टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सध्याची काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करण्याचे सुचविले आहे.तर राज्यात कुठेही १,४०० रुपये या किमतीतच रेमडेसिविर मिळाले पाहिजे, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेमडेसिविरचे उत्पादन १५ दिवसांत दुप्पट होणार असल्याचेही ते म्हणाले.

इंजेक्शन मिळविणे झाले अवघडइंजेक्शन खरेदीसाठी आधारकार्ड, प्रिस्क्रिप्शन सक्तीचे केल्याने हे इंजेक्शन मिळविताना नाकीनऊ येत आहेत, अशी अपेक्षा आहे, असे रुग्णाचे नातेवाईक वंदना आशापुरा यांनी सांगितले.

प्रिस्क्रिप्शन न देता मागणीमुलुंड येथील खासगी रुग्णालयाने विनाप्रिस्किप्शन रेमडेसिविर घेऊन येण्यास सांगितले. मात्र, कुणीच ते दिले नाही. एफडीएने प्रिस्क्रिप्शनची सक्ती केल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने चिठ्ठी दिली. त्यामुळे आठ तासांनंतर इंजेक्शन मिळाले, असे रुग्णाचे नातेवाईक दयावंत भोसकर म्हणाले.

मागील काही काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले होते. आता अचानक कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उत्पादकांशी चर्चा करून त्वरित उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे.    - बी. मंत्री, सहायक आयुक्त,     अन्न व औषध प्रशासन विभाग

 ...तर तक्रार नोंदवा!- डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णास रेमडेसिविर घेण्याची चिठ्ठी द्यावी. रेमडेसिविरची गरज भासल्यास अन्न औषध प्रशासनाच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. - काळाबाजार करणाऱ्यांची माहिती १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे