शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Remdesivir Injection : राज्यात दिवसाला ५० हजार रेमडेसिविरची गरज; ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:17 IST

Remdesivir Injection : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे.

मुंबई : राज्यात दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असून, तेवढ्या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे, तर मुंबईत सध्या दिवसाला तीन ते अडीच हजार रेमडेसिविर व्हायल्सची गरज भासत आहे,  पालिका रेमडेसिविर खरेदीसाठी कोणत्याही अन्य यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः खरेदी करत आहे. पालिकेच्या या पूर्वनियाेजनामुळे पालिका रुग्णालयात रेमडेसिविरचा कधीच तुटवडा भासत नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने दिली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे. टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सध्याची काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करण्याचे सुचविले आहे.तर राज्यात कुठेही १,४०० रुपये या किमतीतच रेमडेसिविर मिळाले पाहिजे, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेमडेसिविरचे उत्पादन १५ दिवसांत दुप्पट होणार असल्याचेही ते म्हणाले.

इंजेक्शन मिळविणे झाले अवघडइंजेक्शन खरेदीसाठी आधारकार्ड, प्रिस्क्रिप्शन सक्तीचे केल्याने हे इंजेक्शन मिळविताना नाकीनऊ येत आहेत, अशी अपेक्षा आहे, असे रुग्णाचे नातेवाईक वंदना आशापुरा यांनी सांगितले.

प्रिस्क्रिप्शन न देता मागणीमुलुंड येथील खासगी रुग्णालयाने विनाप्रिस्किप्शन रेमडेसिविर घेऊन येण्यास सांगितले. मात्र, कुणीच ते दिले नाही. एफडीएने प्रिस्क्रिप्शनची सक्ती केल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने चिठ्ठी दिली. त्यामुळे आठ तासांनंतर इंजेक्शन मिळाले, असे रुग्णाचे नातेवाईक दयावंत भोसकर म्हणाले.

मागील काही काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले होते. आता अचानक कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उत्पादकांशी चर्चा करून त्वरित उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे.    - बी. मंत्री, सहायक आयुक्त,     अन्न व औषध प्रशासन विभाग

 ...तर तक्रार नोंदवा!- डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णास रेमडेसिविर घेण्याची चिठ्ठी द्यावी. रेमडेसिविरची गरज भासल्यास अन्न औषध प्रशासनाच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. - काळाबाजार करणाऱ्यांची माहिती १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे