शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 05:21 IST

राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत.

मुंबई : राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) दिलेली मुदत १० आॅगस्टला संपली तरी विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रे जमा करणे, शुल्क भरण्यासाठी १२ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना १० आॅगस्टला नजीकच्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.सीईटी सेलने सध्याच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत येत्या दोन दिवसांत महाविद्यालयांना तशा सूचना देऊन महाविद्यालय सुरू ठेवून प्रवेश द्यावेत यासाठी प्रयत्न केले आहेत. वैद्यकीय संचालनालयानेही तशा सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना जाणे शक्य नसल्याने त्यांना जवळच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध केल्याने असल्याने त्या महाविद्यालयाची यादी संकेतस्थळावर देण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.सारचा उपयोग महत्त्वपूर्ण होतासीईटी सेलमधून तंत्रशिक्षणाच्या प्रवेशातील झालेल्या किरकोळ अडथळ्यामुळे सार पोर्टल बंद करण्यात आले. याचा मुख्य फटका आता एमबीए प्रवेशानंतर मेडिकल प्रवेशाला बसला आहे. पूरस्थिती आणि पावसात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येत आहेत त्या सार पोर्टलच्या सेतू केंद्रामुळे पूर्ण करता आल्या असत्या. आम्हाला पूरग्रस्त भागात जाऊन प्रवेशासाठी वेळ द्यावा लागला नसता, असे म्हणणे सीईटी सेलमध्ये आलेल्या एका पालकाने मांडले. मला सांगली येथील महाविद्यालय मिळाले आहे. पण पुरामुळे मला जाता येत नाही. सद्य:स्थितीत मला कोणत्याही सेतू केंद्रात जाऊन प्रवेश घेता येईल, असे पालकाने सांगितले.जिल्हानिहाय आकडेवारीसातारा : २१, सांगली : २०, कोल्हापूर : ३१, औरंगाबाद : १०१, नागपूर : १३१, मुंबई : ३६, मुंबई उपनगर : ५८, ठाणे : ७१, पुणे : ८७ .मुंबईतील डॉक्टरांचे पथककोल्हापूर, सांगलीला रवानामुंबई : कोल्हापूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बिकट पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथे आता वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने ३० डॉक्टरांचे एक पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. या काळात लागतील अशी औषधे आणि साधन सामुग्रीही त्यांनी सोबत नेली आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागात मुंबईतील डॉक्टरांचे पथक व मदत पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी बैठकीत घेतला. मुंबईतही मुसळधार पावसात मिठी नदीचा धोका निर्माण होत असल्याने त्याबाबतही उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर