शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 05:21 IST

राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत.

मुंबई : राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) दिलेली मुदत १० आॅगस्टला संपली तरी विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रे जमा करणे, शुल्क भरण्यासाठी १२ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना १० आॅगस्टला नजीकच्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.सीईटी सेलने सध्याच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत येत्या दोन दिवसांत महाविद्यालयांना तशा सूचना देऊन महाविद्यालय सुरू ठेवून प्रवेश द्यावेत यासाठी प्रयत्न केले आहेत. वैद्यकीय संचालनालयानेही तशा सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना जाणे शक्य नसल्याने त्यांना जवळच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध केल्याने असल्याने त्या महाविद्यालयाची यादी संकेतस्थळावर देण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.सारचा उपयोग महत्त्वपूर्ण होतासीईटी सेलमधून तंत्रशिक्षणाच्या प्रवेशातील झालेल्या किरकोळ अडथळ्यामुळे सार पोर्टल बंद करण्यात आले. याचा मुख्य फटका आता एमबीए प्रवेशानंतर मेडिकल प्रवेशाला बसला आहे. पूरस्थिती आणि पावसात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येत आहेत त्या सार पोर्टलच्या सेतू केंद्रामुळे पूर्ण करता आल्या असत्या. आम्हाला पूरग्रस्त भागात जाऊन प्रवेशासाठी वेळ द्यावा लागला नसता, असे म्हणणे सीईटी सेलमध्ये आलेल्या एका पालकाने मांडले. मला सांगली येथील महाविद्यालय मिळाले आहे. पण पुरामुळे मला जाता येत नाही. सद्य:स्थितीत मला कोणत्याही सेतू केंद्रात जाऊन प्रवेश घेता येईल, असे पालकाने सांगितले.जिल्हानिहाय आकडेवारीसातारा : २१, सांगली : २०, कोल्हापूर : ३१, औरंगाबाद : १०१, नागपूर : १३१, मुंबई : ३६, मुंबई उपनगर : ५८, ठाणे : ७१, पुणे : ८७ .मुंबईतील डॉक्टरांचे पथककोल्हापूर, सांगलीला रवानामुंबई : कोल्हापूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बिकट पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथे आता वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने ३० डॉक्टरांचे एक पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. या काळात लागतील अशी औषधे आणि साधन सामुग्रीही त्यांनी सोबत नेली आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागात मुंबईतील डॉक्टरांचे पथक व मदत पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी बैठकीत घेतला. मुंबईतही मुसळधार पावसात मिठी नदीचा धोका निर्माण होत असल्याने त्याबाबतही उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर