शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 05:21 IST

राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत.

मुंबई : राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) दिलेली मुदत १० आॅगस्टला संपली तरी विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रे जमा करणे, शुल्क भरण्यासाठी १२ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना १० आॅगस्टला नजीकच्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.सीईटी सेलने सध्याच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत येत्या दोन दिवसांत महाविद्यालयांना तशा सूचना देऊन महाविद्यालय सुरू ठेवून प्रवेश द्यावेत यासाठी प्रयत्न केले आहेत. वैद्यकीय संचालनालयानेही तशा सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना जाणे शक्य नसल्याने त्यांना जवळच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध केल्याने असल्याने त्या महाविद्यालयाची यादी संकेतस्थळावर देण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.सारचा उपयोग महत्त्वपूर्ण होतासीईटी सेलमधून तंत्रशिक्षणाच्या प्रवेशातील झालेल्या किरकोळ अडथळ्यामुळे सार पोर्टल बंद करण्यात आले. याचा मुख्य फटका आता एमबीए प्रवेशानंतर मेडिकल प्रवेशाला बसला आहे. पूरस्थिती आणि पावसात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येत आहेत त्या सार पोर्टलच्या सेतू केंद्रामुळे पूर्ण करता आल्या असत्या. आम्हाला पूरग्रस्त भागात जाऊन प्रवेशासाठी वेळ द्यावा लागला नसता, असे म्हणणे सीईटी सेलमध्ये आलेल्या एका पालकाने मांडले. मला सांगली येथील महाविद्यालय मिळाले आहे. पण पुरामुळे मला जाता येत नाही. सद्य:स्थितीत मला कोणत्याही सेतू केंद्रात जाऊन प्रवेश घेता येईल, असे पालकाने सांगितले.जिल्हानिहाय आकडेवारीसातारा : २१, सांगली : २०, कोल्हापूर : ३१, औरंगाबाद : १०१, नागपूर : १३१, मुंबई : ३६, मुंबई उपनगर : ५८, ठाणे : ७१, पुणे : ८७ .मुंबईतील डॉक्टरांचे पथककोल्हापूर, सांगलीला रवानामुंबई : कोल्हापूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बिकट पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथे आता वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने ३० डॉक्टरांचे एक पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. या काळात लागतील अशी औषधे आणि साधन सामुग्रीही त्यांनी सोबत नेली आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागात मुंबईतील डॉक्टरांचे पथक व मदत पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी बैठकीत घेतला. मुंबईतही मुसळधार पावसात मिठी नदीचा धोका निर्माण होत असल्याने त्याबाबतही उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर