शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रिलायन्स, एअरसेलची भागीदारी

By admin | Updated: September 15, 2016 03:40 IST

रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेल या दोन कंपन्यांनी यापुढे भारतात मोबाईल सेवा पुरविण्याचा व्यवसाय एकत्रितपणे करण्याचे जाहीर केले आहे.

मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेल या दोन कंपन्यांनी यापुढे भारतात मोबाईल सेवा पुरविण्याचा व्यवसाय एकत्रितपणे करण्याचे जाहीर केले आहे. या भागिदारीत दोन्ही कंपन्यांचा समान वाटा असेल व त्यांच्या एकत्र येण्याने ग्राहकसंख्येच्या दृष्टीने देशातील ही चौथ्या क्रमांकाची मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी ठरणार आहे.आरकॉम आणि एअरसेलची प्रवर्तक असलेली मलेशियाची मॅक्सिस कम्युनिकेशन्स बेऱ्हार्ड या दोन कंपन्यांमध्ये यासाठीचे करारमदार सोमवारी झाले. आरकॉमच्या संचालक मंडळाने बुधवारी औपचारिक मंजुरी दिल्यावर या भागिदारीची औपेचारिक घोषणा करण्यात आली. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील ही सर्वात महत्वाची घटना मानली जात आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रात बरीच उलथापालथ अपेक्षित होती. बरेच दिवस चर्चेत असलेली ही भागिदारी त्याचाच एक भाग आहे.या दोन्ही भागिदारांकडे मिळून ८५०, ९००, १८०० आणि २१०० मेगाहर्स्ट््स बॅण्डचा एकूण ४४८ मेगाहर्स्ट््स एवढा स्पेक्ट्रम उपलब्ध असेल. त्यांची स्पेक्ट्रमची ही पुंजी देशातील मोबाईल कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची असेल. त्यांची एकत्रित मालमत्ता ६५ हजार कोटी रुपयांची असेल. त्यांची एकत्रित सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व २२ परिमंडळांत उपलब्ध असेल.याखेरीज आरकॉमच्या आधी झालेल्या स्वतंत्र करारामुळे या एकित्रत भागिदारीच्या ग्राहकांना रिलायन्स जिओची नव्याने सुरु झालेली ४-जी सेवाही उपलब्ध होईल.दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार या भागिदारीमुळे सन २०१७च्या अखेरीस आरकॉमचा कर्जाचा बोजा २० हजार कोटींनी तर एअरसेलचा कर्जाचा बोजा चार हजार कोटी रुपयांनी कमी होईल. दोघांचे मिळून नक्त मूल्य ३५ हजार कोटी रुपये असेल. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलिनिकरण मानले जात आहे.ही भागिदारी फक्त वायरलेस व्यवसायापुरती आहे. आरकॉमचा डेटा सेंटर, आॅप्टिक फायबर, दूरसंचार पायाभूत यंत्रणा इत्यादी व्यवसाय स्वतंत्रपणे सुरु राहील. (प्रतिनिधी)आधी एसएसटीएल (सिस्टेमा/ एमटीएस) विकत घेऊन व आता एमसीबीसोबत ५०:५० भागिदारी करून भारतीय दूरसंचार क्षेत्राला बळकटी देता आल्याने आम्हाला आनंद होत आहे.-अनिल अंबानी, अध्यक्ष, आरकॉमही भागिदारी करून एमसीबीने भारताशी पुन्हा एकदा बांधिलकी दाखवली आहे. २००६ मध्ये एअरसेल ताब्यात घेतल्यापासून आम्ही भारतात केलेली ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही केवळ दूरसंचारच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे.-मॅक्सिस कम्यु, बेऱ्हार्ड कंपनीचे निवेदन