शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:34 IST

सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे

ठळक मुद्देराजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्येही विस्तार वाढला...

अविनाश कोळी ।सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये रक्तदात्यांचा सोशल मीडिया ग्रुप स्थापन करून त्यांना मदत पुरविली जात आहे. रक्ताच्या नात्यांचे हे जाळे आता देशभर पसरविण्याचे काम गतीने पुढे जात आहे.तासगावमधील विक्रम यादव यांनी गरिबीला तोंड देत या सामाजिक चळवळीला जन्म दिला. अनेक दु:खद प्रसंगातून बोध घेताना त्यांनी या चळवळीला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षातील त्यांची ही धडपड आता देशव्यापी बनू पाहत आहे. बॉम्बे ओ रक्तगट हा दुर्मिळातील दुर्मिळ रक्तगट मानला जातो. अशा दुर्मिळ रक्तदात्यांना व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एकत्र केले. दुसरीकडे त्यांना पाठबळ देणाऱ्या अन्य रक्तदात्यांनाही सोबत घेतले. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३0 धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा व अन्य राज्यात ज्याठिकाणी या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे.सांगली जिल्ह्यात रुजलेल्या चळवळीने अनेकांना जीवदान दिले. गरोदर मातांपासून लहान मुलांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांना कोणत्याही वेळी रक्त पुरविण्याची व्यवस्था त्यांनी केली. आपल्या राज्यापुरताच आपण विचार न करता, अन्य राज्यातील देशबांधवांचाही विचार केला पाहिजे, असा विचार यादव यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून अन्य राज्यात रक्तदात्यांच्या चळवळीची बांधणी सुरू केली.आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. भविष्यात देशभरातील अन्य राज्यांमध्ये या चळवळीच्या विस्ताराचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.असे पुरविले जाते रक्त...एखाद्या राज्यातील रुग्णास बॉम्बे ओ किंवा अन्य कोणत्या रक्ताची गरज असेल, तर मुंबईतील थिंक फौंडेशनकडे जिल्ह्यातील किंवा महाराष्टÑातील रक्तदाता रक्तदान करतो. त्यानंतर विमानाने ते रक्त संबंधित राज्याच्या राजधानीत किंवा जवळच्या शहरात पोहोचविले जाते. तिथून त्याठिकाणचा कार्यकर्ता गरजेच्या ठिकाणी रक्त पोहोचवतो. यासाठीचा खर्च भागविण्यासाठी राज्यातील १५ हजार ७३0 रक्तदाते प्रत्येकी दहा रुपयांप्रमाणे निधी गोळा करतात. त्यातून विनामूल्य हे रक्त रुग्णापर्यंत पोहोचविले जाते.असे आहेत परराज्यातील ग्रुपहिमाचल प्रदेशात ५00 दात्यांचा गट असून त्याठिकाणी ‘बॉम्बे ओ’चा दाता नाही.मध्य प्रदेशात ८00 रक्तदात्यांचा गट असून त्यामध्ये ‘बॉम्बे ओ’ या गटातील एकच रक्तदाता आहे. या गटाशी यादव यांचा दैनंदिन संपर्क आहे.राजस्थानमध्ये ३ हजार रक्तदात्यांचा गट असून त्यामध्ये दोघेजण ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटाचे आहेत.यापूर्वी कोलंबिया आणि मलेशियामधील रुग्णांना या ग्रुपने बॉम्बे ओ या रक्ताचा पुरवठा केला आहे. राज्य व देशाच्या सीमा ओलांडत रक्ताची नाती तयार करणाºया या गटाने त्यांचा कार्यविस्तार वेगाने वाढविण्यास सुरुवात केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारतState Governmentराज्य सरकार