शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

हटविलेले स्टॉल ग्रामस्थांनी पुन्हा उभारले, ग्रामस्थांचा उद्रेक, अचानक राबविलेल्या मोहिमेबाबत नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 20:42 IST

मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

आंबोली - येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.  तसेच रात्री अचानक स्टॉल हटविण्याच्या कृतीबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.आंबोलीतील मुख्य धबधब्यावर गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी स्टॉल उभारले आहेत. पण या स्टॉलधारकांना चार दिवसांपूर्वी अचानक वनविभागाने नोटिसा दिल्या. तर सोमवारी रात्रीच्या सुमारास हे स्टॉल काढून टाकण्यात आले. सुरुवातीला वनविभागाने स्टॉल काढून टाकण्याचे श्रेय घेतले खरे; पण स्टॉलधारकांचा उद्रेक बघून आपण त्यातले नाहीच असा पवित्रा वनविभागाने दिवसभर घेतला होता. स्टॉलधारकांनी स्टॉलसाठी लावलेले बांबूही दरीत फेकून देण्यात आले होते. वनविभागाने रितसर कारवाई करायची सोडून रात्रीच्या वेळी कारवाई केल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. सोमवारी वनविभागाच्या कार्यालयासमोर आंबोलीतील ग्रामस्थ केशव जाधव यांनी उपोषण केले होते. त्यानंतर वनविभागाने हा निर्णय घेतला होता. हे स्टॉल अनधिकृत आहेत. त्यामुळे स्टॉल हटविणारच, असा पवित्रा वनविभागाने घेतला होता. स्टॉलधारक आपले स्टॉल रात्री आठच्या सुमारास बंद करून जातात. हीच संधी साधत हे स्टॉल हटविले होते. पण मंगळवारी सकाळी स्टॉलधारकांना हे समजले. आपले स्टॉल हटविल्यामुळे स्टॉलधारक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली होती. मात्र आचारसंहिता असल्याने सर्व स्टॉलधारक आपल्या आंदोलनाची दिशा ठरवित होते. त्याचवेळी स्टॉलधारकांनी आक्रमक होत पुन्हा स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतला. कोण आपले स्टॉल हटवते ते बघूया, असे म्हणत हे स्टॉल उभारले. मात्र उशिरापर्यंत वनविभागाचे कोणीही अधिकारी तेथे फिरकले नाहीत.दरम्यान, सोमवारी रात्री स्टॉल हटविले आणि मंगळवारी सायंकाळी स्टॉलधारकांनी पुन्हा स्टॉल उभारल्याने सध्या तरी हा वाद शमला असला तरी पुन्हा केव्हाही उभा राहू शकतो, असे मत आंबोलीतील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच शांत आंबोली नको त्या कारणांनी अशांत बनविली जात असल्याचा आरोपही स्टॉलधारक करीत आहेत.आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होतेयसध्या आंबोलीच्या पर्यटनाची या ना त्या कारणाने वनविभाग बदनामी करीत आहे. कधी धबधबा कोणाचा यावरून वाद, तर कधी स्टॉलवरून वाद. यापूर्वी कधीही अशाप्रकारे वाद नव्हते. पण आता हे नव्याने आंबोलीत वाद उभे राहत आहेत. त्यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी करणा-या अधिका-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.आंबोलीतील स्टॉल हटविण्याचे काम आंबोली वनविभागातील कर्मचा-यांकडून काही वरिष्ठ अधिका-यांनी करून घेतले. पण मंगळवारी ही कारवाई अंगलट येणार असे वाटल्याने अखेर सर्व स्टॉल उभारण्यास परवानगी दिली. तसेच याबाबत सर्वच अधिका-यांनी कानावर हात घेतले. अधिकारी कोणाचे दूरध्वनीही घेण्यास तयार नव्हते.कारवाई करणारसोमवारी रात्री जे स्टॉल हटविले ते वनविभागानेच हटविले आहेत. हे सर्व स्टॉल अनधिकृत होते व वनविभागाच्या जागेत होते. पर्यटनस्थळावर येणा-यांना पार्किंगचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हे स्टॉल वनविभागाने हटविले आहेत आणि जर पुन्हा या ठिकाणी स्टॉल उभारले गेले असतील तर नियमात राहून कारवाई करण्यात येणार आहे.- संजय कदम, वनक्षेत्रपाल, आंबोली