शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

13 लाख शेतक-यांची कर्जमाफीसाठी नोंदणी, बुलडाण्यात सर्वाधिक 3.42 लाख भरले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 17:18 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विभागात शुक्रवारपर्यंत १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली

अमरावती, दि. 10 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विभागात शुक्रवारपर्यंत १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ११ लाख ३६ हजार ९९४ शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात आपले सरकार या पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे.योजनेची १५ सप्टेंबर 'डेडलाइन' आहे. मात्र या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने या योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.सुरुवातीपासूनच या योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही. बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाइन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.११ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाइन अर्जअमरावती विभागात १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली, तर ११ लाख ३६ हजार ९९४ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३,८३,४५७ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली व ३,४२,५३४ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात १,८६,३९७ नोंदणी व १,५४,६४८ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,४२,४८३, शेतक-यांची नोंदणी व १,९७,२३८ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात १,९५,५०६ शेतक-यांची नोंदणी व १,६३,१३६ अर्ज भरले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३,५०,९२५ शेतक-यांची नोंदणी व २,७९,४३८ शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.