शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यातील ५९ हजार २६३ धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द, धर्मादाय आयुक्तालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:59 IST

अकार्यरत धर्मादाय संस्थांवर कारवाईचा बडगा धर्मादाय आयुक्तालयाने उगारल्यामुळे, राज्यभरातील जवळपास ६० हजार संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या वर्षभरात राज्यभरातील ५९ हजार २६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती धर्मादाय आयुक्तालयाने दिली. यात मुंबई शहर-उपनगरातील सुमारे ४ हजार ४९८ संस्थांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांचे हिशेबपत्रक, फेरफार अहवाल, धर्मादाय आयुक्तालयांच्या नियमांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, लेखापत्र सादर केलेले नाहीत, अशा एक ना अनेक कारणांमुळे धर्मादाय संस्थांची कारवाई रद्द करण्यात आली आहे. 

स्नेहा मोरे मुंबई : अकार्यरत धर्मादाय संस्थांवर कारवाईचा बडगा धर्मादाय आयुक्तालयाने उगारल्यामुळे, राज्यभरातील जवळपास ६० हजार संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या वर्षभरात राज्यभरातील ५९ हजार २६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती धर्मादाय आयुक्तालयाने दिली. यात मुंबई शहर-उपनगरातील सुमारे ४ हजार ४९८ संस्थांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांचे हिशेबपत्रक, फेरफार अहवाल, धर्मादाय आयुक्तालयांच्या नियमांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, लेखापत्र सादर केलेले नाहीत, अशा एक ना अनेक कारणांमुळे धर्मादाय संस्थांची कारवाई रद्द करण्यात आली आहे. कोणत्याही संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येते. संस्थांची मान्यता रद्द करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. संस्थांच्या कामकाजाची तपासणी, आढावा घेण्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अनावश्यक वेळ खर्च होतो. या संस्थांनी करावयाचा करभरणा, त्यांचे लेखे, त्यांचे नूतनीकरण हा सगळा व्याप या कार्यालयास सांभाळावा लागतो. काही संस्था ज्या उद्दिष्टांसाठी स्थापन केल्या आहेत. त्या अनेक संस्था मूळ उद्देशापासून भरकटल्याचे वारंवार आढळले आहे. परिणामी, या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.  यात नागपूर येथील सर्वाधिक संस्थांची म्हणजेच, १४ हजार ८५३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्या खालोखाल लातूर येथील ८ हजार ६१३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना धर्मादाय आयुक्तालयाचे आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सार्वजनिक राज्य विश्वस्त व्यवस्था अधिनियम  १९५० चे २२(३)नुसार धर्मादाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार, ज्या विश्वस्त मंडळांनी सर्व माहितीची पूर्तता केलेली नसेल किंवा विश्वस्त मंडळाची निवड बेकायदेशीर झालेले असेल तसेच विश्वस्त मंडळ कोणतेही कार्य करत नसल्याचे आढळून आल्यास, त्याची नोंदणी रद्द करण्यात येते.