शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कितीही तणातणी झाली तरी सरकार महायुतीचेच येणार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:21 IST

...तर अमित शहा मार्ग काढतील

कोल्हापूर : दोन सख्ख्या भावांत भांडणे असतात, त्याप्रमाणे आमच्यात थोड्या कुरबुरी असल्या तरी दोघांचाही नीट सन्मान ठेवून सगळे व्यवस्थित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे हे सत्तेचे वाटप नीट करतील. फारच तणाताणी झाली तर पक्षाध्यक्ष अमित शहा मार्ग काढतील. त्यामुळे सरकार महायुतीचेच येणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. याचवेळी ‘कोणावर तरी अन्याय हीच न्यायाची व्याख्या,’ असे संकेतही त्यांनी दिले.

पश्चिम महाराष्ट्र हा दोन्ही कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण २००८ मध्ये आपण पदवीधर आणि भगवानराव साळुंखे यांनी शिक्षक मतदारसंघातून या बालेकिल्ल्याला हादरा दिला. त्यानंतर २००९ ला कोल्हापुरात युतीला चार, तर सांगलीत तीन जागा मिळाल्या आणि २०१४ ला या जागांत दुप्पट वाढ झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा निवडणुकीत आम्ही मुसंडी मारली; पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडे आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. भाजप, शिवसेनेची पीछेहाट झाल्याची कोल्हेकुई सुरू आहे; पण १९९९ पासूनची राज्यातील दोन्ही कॉँग्रेस आणि युतीची कुंडली पाहिली तर आम्ही कितीतरी पटींनी पुढे आहोत. या निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट गतवेळेपेक्षा खूप चांगला आहे. जागांचे म्हटले तर १०५ अधिक २० अपक्ष आमच्यासोबत आहेत. शिवसेनेचे ५६ अधिक पाच अपक्ष असे १८६ पेक्षा अधिक संख्याबळ होते. त्यामुळे गतवेळेपेक्षा कोठे-कोठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू, असेही त्यांनी सांगितले.

मग शेखर गोरे यांना ‘एबी’ फॉर्म का दिला?बंडखोरांवर कारवाईची प्रक्रिया अनुशासन समितीच्या माध्यमातून सुरू आहे; पण यामध्ये केवळ भाजप पदाधिकारीच दोषी नाहीत. जयकुमार गोरे यांच्या विरोधात शेखर गोरे यांना शिवसेनेने ‘एबी’ फॉर्म दिला. कणकवलीतही तसेच केले. कागलमध्ये दोन्ही घाटगेंना समजावून सांगायला हवे होते. समरजित घाटगे यांना मुंबईला बोलावले, दोन दिवस थांबविले आणि संजय घाटगे यांना ‘एबी’ फॉर्म दिल्याने ते चिडल्याचे पाटील यांनी सांगितले.

मंडलिकांकडून शिवसेना बासनातशिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांत सोईनुसार भूमिका घेत पक्ष बासनात गुंडाळला. शिवसेनेने याबाबत विचार करावा आणि ज्यांनी शिवसेना वाढविली, त्या संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, राजेश क्षीरसागर यांनी एकत्रित येऊन पक्ष मजबूत करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.कॉँग्रेसला बळ देणारा निर्णय ठाकरे घेणार नाहीतशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. बाळासाहेबांनी सातत्याने तत्त्वाचे राजकारण केले शिवाय काँग्रेसरूपी अंगाराचा चटका कसा लागतो, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देणारा निर्णय ते घेणार नाहीत. - चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्षमुंडे, राम शिंदे यांच्या पुनर्वसनाबाबत विचार सुरूउदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून, पक्ष त्यांची नीट काळजी घेईल. पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे यांच्या पुनर्वसनाबाबत विचार सुरू असून आमच्याकडे खूप पर्याय असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे पारदर्शक कारभार केलाअसून, तेच मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील