शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

कितीही तणातणी झाली तरी सरकार महायुतीचेच येणार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:21 IST

...तर अमित शहा मार्ग काढतील

कोल्हापूर : दोन सख्ख्या भावांत भांडणे असतात, त्याप्रमाणे आमच्यात थोड्या कुरबुरी असल्या तरी दोघांचाही नीट सन्मान ठेवून सगळे व्यवस्थित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे हे सत्तेचे वाटप नीट करतील. फारच तणाताणी झाली तर पक्षाध्यक्ष अमित शहा मार्ग काढतील. त्यामुळे सरकार महायुतीचेच येणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. याचवेळी ‘कोणावर तरी अन्याय हीच न्यायाची व्याख्या,’ असे संकेतही त्यांनी दिले.

पश्चिम महाराष्ट्र हा दोन्ही कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण २००८ मध्ये आपण पदवीधर आणि भगवानराव साळुंखे यांनी शिक्षक मतदारसंघातून या बालेकिल्ल्याला हादरा दिला. त्यानंतर २००९ ला कोल्हापुरात युतीला चार, तर सांगलीत तीन जागा मिळाल्या आणि २०१४ ला या जागांत दुप्पट वाढ झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा निवडणुकीत आम्ही मुसंडी मारली; पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडे आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. भाजप, शिवसेनेची पीछेहाट झाल्याची कोल्हेकुई सुरू आहे; पण १९९९ पासूनची राज्यातील दोन्ही कॉँग्रेस आणि युतीची कुंडली पाहिली तर आम्ही कितीतरी पटींनी पुढे आहोत. या निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट गतवेळेपेक्षा खूप चांगला आहे. जागांचे म्हटले तर १०५ अधिक २० अपक्ष आमच्यासोबत आहेत. शिवसेनेचे ५६ अधिक पाच अपक्ष असे १८६ पेक्षा अधिक संख्याबळ होते. त्यामुळे गतवेळेपेक्षा कोठे-कोठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू, असेही त्यांनी सांगितले.

मग शेखर गोरे यांना ‘एबी’ फॉर्म का दिला?बंडखोरांवर कारवाईची प्रक्रिया अनुशासन समितीच्या माध्यमातून सुरू आहे; पण यामध्ये केवळ भाजप पदाधिकारीच दोषी नाहीत. जयकुमार गोरे यांच्या विरोधात शेखर गोरे यांना शिवसेनेने ‘एबी’ फॉर्म दिला. कणकवलीतही तसेच केले. कागलमध्ये दोन्ही घाटगेंना समजावून सांगायला हवे होते. समरजित घाटगे यांना मुंबईला बोलावले, दोन दिवस थांबविले आणि संजय घाटगे यांना ‘एबी’ फॉर्म दिल्याने ते चिडल्याचे पाटील यांनी सांगितले.

मंडलिकांकडून शिवसेना बासनातशिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांत सोईनुसार भूमिका घेत पक्ष बासनात गुंडाळला. शिवसेनेने याबाबत विचार करावा आणि ज्यांनी शिवसेना वाढविली, त्या संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, राजेश क्षीरसागर यांनी एकत्रित येऊन पक्ष मजबूत करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.कॉँग्रेसला बळ देणारा निर्णय ठाकरे घेणार नाहीतशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. बाळासाहेबांनी सातत्याने तत्त्वाचे राजकारण केले शिवाय काँग्रेसरूपी अंगाराचा चटका कसा लागतो, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देणारा निर्णय ते घेणार नाहीत. - चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्षमुंडे, राम शिंदे यांच्या पुनर्वसनाबाबत विचार सुरूउदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून, पक्ष त्यांची नीट काळजी घेईल. पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे यांच्या पुनर्वसनाबाबत विचार सुरू असून आमच्याकडे खूप पर्याय असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे पारदर्शक कारभार केलाअसून, तेच मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील