शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 05:51 IST

पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे.

- संजय पाठकनाशिक : महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. पन्नास लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांचा दरडोई पाणीपुरवठा १३५ लिटर्स इतका करण्यात आल्याने धरणातील पाणी आरक्षण तसेच पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होईल. राज्यातील बहुतांश महापालिका व नगरपालिका जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलस्रोतांवर निर्भर आहेत. मोजक्याच महापालिकांनी स्वत:च्या मालकीची धरणे बांधली आहेत. महापालिका क्षेत्रात साधारणत: दरडोई दीडशे लीटर्स पाणीपुरवठ्याचे यापूर्वीचे मानक होते. मात्र त्यात आता बदल केला आहे.महाराष्टÑ जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांनाच १५0 लीटर दरडोईचा निकष लागू केला असून, ५0 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांना मात्र १३५ लीटर इतकाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या मर्यादेचे पालन करण्यासाठी त्याचे दरही त्यानुसारच निश्चित असणार आहेत. निकषानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकांना नियमित दरानुसार पाणीपुरवठा होईल. परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे ११५ ते १४0 टक्के पाण्याचा वापर केल्यास दीडपट दर आकारला जाईल, तर त्याहून अधिक वापर झाल्यास दुप्पट दराने आकारणी होईल. त्यामुळे महापालिकांचे आर्थिक नियोजन आणि पाणीवापराचे लोकांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.>तीन पालिका वगळता इतरांना झळमुंबई, ठाणे आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास लाखांपेक्षा अधिक असल्याने त्या खेरीज कमी लोकसंख्येच्या अन्य सर्वच महापालिकांना या निर्णयाची झळ बसणार आहे.>पाणी वापराच्या मर्यादा आवश्यक आहेत. परंतु मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास थेट दंड आकारण्यापेक्षा महापालिकांना पाणी बचतीसाठी कालावधी देण्यात यावा. तसेच निकष पाळणाऱ्यांना सवलत द्यावी.- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्तकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग