शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

शिक्षणाद्वारे शेतीवरील बोजा कमी करा

By admin | Updated: February 26, 2017 17:23 IST

ज्या शेतकरी कुटुंबात शिक्षण वाढले, तिथे सुबत्ता आली़ त्यामुळे शिक्षण घ्या, केवळ शेतीवर विसंबून राहू नका

अविनाश चमकुरे /ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 26 -  ज्या शेतकरी कुटुंबात शिक्षण वाढले, तिथे सुबत्ता आली. त्यामुळे शिक्षण घ्या, केवळ शेतीवर विसंबून राहू नका, जोपर्यंत शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा शिक्षणाद्वारे कमी करणार नाही तोपर्यंत प्रगतीच्या वाटा खुलणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत समारंभात केले.अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती सी़ विद्यासागर राव होते. मंचावर पालकमंत्री अर्जून खोतकर, कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरु डॉ़ गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी़बी़ पाटील, बीसीयुडी डॉ़ दिपक पानसकर, परीक्षा नियंत्रक डॉ़ रवी एऩ सरोदे यांची उपस्थिती होती़ दीक्षांत भाषणात शरद पवार म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आजही शेती हाच आहे़ शेतीवर अवलंबून राहणारी लोकसंख्या जेवढी अधिक, तिथे गरिबी अधिक हे समीकरण जगभर दिसेल. ज्या ठिकाणी शेती करणारा वर्ग अन्य क्षेत्रात गेला तिथे स्थिती बदलली आहे. इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका आदी देशात १२ ते २० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत़ त्यामुळे ते देश प्रगत दिसत आहेत. याउलट भारत, इंडोनेशिया, श्रीलंका, बांग्लादेश या सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या साठ टक्केपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणूनच येथे बेरोजगारी, दारिद्र्य पहायला मिळते. याचे मूळ शेतीवर प्रमाणापेक्षा अधिक असलेल्या बोजात आहे. शेतीचे झालेले तुकडीकरण, निसर्गावरील अवलंबित्त्व, वाढती लोकसंख्या आदी कारणे केवळ शेतीवर गुजराण करण्यासाठी बाधक ठरतात. त्यासाठी शेतीवरचा भार कमी होणे गरजेचे आहे़ म्हणून कृषीप्रधान वर्गाला शिक्षण देण्याची त्या शिक्षित वर्गाकडून नवीन साधन-संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध करुन देण्याची गरज आहे़ शिवाय शेतीवरील अवलंबित्त्व कमी करणे हाच यावरील उपाय आहे़ आपल्या देशातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही पंचविशीच्या आतली आहे़ भारतीयांचे सरासरी वय एकोणीस आहे़ ही लोकसंख्या आपली ताकद आहे हे ओळखून शिक्षणाच्या चांगल्या संधी या वर्गाला कशा उपलब्ध होतील यावर तो ‘सामर्थ्य बनेल की ओझे?’ हे अवलंबून असणार आहे़ शिक्षणातून विद्यार्थ्यांना कसं घडवावं, त्यांना राष्ट्रहितासाठी प्रेरीत करुन इतिहास कसा घडवावा, याचे आदर्शवत उदाहरण स्वामी रामानंद तीर्थ होते़ निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्याबरोबरच शिक्षणाची गंगा वाहती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले़ नांदेड येथील विद्यापीठ उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात करण्यासाठी चर्चा झाली़ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने नांदेड येथील विद्यापीठास स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना घेतल्याचे पवार यांनी सांगितले.विद्यापीठाच्या स्थापनेला दोन दशक होत आहेत़ विद्यापीठ स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात डॉ़ जनार्दन वाघमारे यांचे नेतृत्त्व विद्यापीठाला लाभले़ तेव्हापासून अंगिकारलेला विद्यार्थीकेंद्रीत विचार, संशोधनावर भर, उत्तम प्रशासन या सगळ्यांचा परिपाक म्हणजे अलीकडच्या काळात विद्यापीठाने गुणवत्तेच्या बळावर ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे़ विद्यमान कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर यांनी सुरु केलेली एक शिक्षक एक कौशल्य योजना, विद्यार्थ्यांना सहाय्य करणारी ‘स्वास’ योजना, श्रेयांक अभ्यासपद्धती पदवीपूर्व स्तरावर सुरु करणारे राज्यातील हे पहीलेच विद्यापीठ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पवार यांनी केला. कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व प्रगतीचा आढावा सादर केला. विविध विद्याशाखेत प्रथम येणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांना सूवर्णपदक देवून यावेळी गौरविण्यात आले़ शरद पवार यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन मराठी विभाग प्रमुख डॉ़ केशव सखाराम देशमुख यांनी केले. यावेळी आ़ अमरनाथ राजूरकर, आ़ हेमंत पाटील, आ़ प्रताप पा़ चिखलीकर, आ़ नागेश पा़ आष्टीकर, आ़ प्रदीप नाईक, माजी मंत्री कमलकिशोर कदम, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी खा़ भास्कर पा़ खतगावकर, माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.शरद पवार यांना डी.लिटसामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने राज्यपाल तथा कुलपती सी़ विद्यासागर राव यांच्या हस्ते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना डी़लीट़ या सर्वोच्च मानद पदवीने गौरविण्यात आले़ यापूर्वी २००८ मध्ये पुणे येथील टिळक विद्यापीठ व २०१३ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डी़लीट़ या उपाधीने सन्मानीत केले आहे. कृषीमंत्री झालो तेव्हा देशातील कोठारात मुबलक धान्यसाठा नव्हता़ कृषीप्रधान देश असल्याने विदेशातून धान्य आयात करण्यास मन धजावले नाही़ देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती धोरण अवलंबिले़ परिणामी सद्यस्थितीत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार तर साखर, कापूस निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी आहे़ याच सार श्रेय शेतात काबाडकष्ट करणाऱ्या लक्षावधी शेतकऱ्यांना जात असल्याचा उल्लेख शरद पवार यांनी भाषणात केला.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत़ आर्थिक अडचण शिक्षणात अडसर ठरु नये या उद्देशाने पवार चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ५० लाख रुपये स्वारातीम विद्यापीठास देण्याचे शरद पवार यांनी घोषित केले़ ही रक्कम बँकेत डीपॉझीट करुन यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, यशवंतराव चव्हाण,पद्मश्री श्यामराव कदम, शारदाबाई पवार यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.