शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ८९० डॉक्टरांची भरती; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 04:30 IST

राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत.

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येते. याची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात ८९० डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून याद्वारे अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात ८९० पदे भरण्यास सुरुवात झाली असून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांची पदे भरण्यात आल्याची माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. राज्यातील आरोग्य केंद्र आणि तेथील डॉक्टरांची संख्या आधीच व्यस्त होती. त्यामुळे सर्वांनाच रुग्णसेवेचा लाभ मिळत नव्हता. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची अधिक चणचण जाणवत होती. त्यातून आरोग्य विभागाने डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टरांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात रस्त्याची सोयही नाही अशा भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९५४ पदे भरलेली आहेत. तर, ६४३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा ‘गट अ’मधील वैद्यकीय अधिकारी आणि ‘आयपीएचएस’अंतर्गत शल्यचिकित्सक, प्रसूती तज्ज्ञ, फिजिशियन आणि बालरोग तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. भरती करण्यात आलेले डॉक्टर अस्थायी प्रकारे सेवा करत होते. आता त्यांना कायम करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.डॉक्टरांच्या इच्छेप्रमाणे भरती करत आहोत. जेवढी रिक्त पदे आहेत ती पदे भरण्यात येतील. या अस्थायी डॉक्टरांच्या मेरिटप्रमाणे त्यांची भरती करत आहोत. भरती कायमस्वरूपी करण्यात आल्याने डॉक्टरही समाधानाने काम करतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीय