शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पीककर्ज परतफेडीस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: June 30, 2015 03:42 IST

पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

मुंबई/ कोल्हापूर : पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळालेले नसल्याने जूनअखेर पीककर्जाची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याजसवलत योजनेपासून मुकावे लागणार होते. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी एक लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्यांना ० टक्के, तर तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला दोेन टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; पण ही रक्कम एक वर्षाच्या आत म्हणजे जूनअखेर परतफेड केली, तरच या योजनेचा लाभ त्यांना मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांची बिले वेळेत मिळत नसल्याने जूनअखेर कर्जाची परतफेड करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा तर उसाचे गाळप होऊन तीन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. राज्यातील ७० टक्के शेतकरी थकीत गेला आहे. परिणामी त्याला व्याजसवलतीला मुकावे लागणार होते. त्यामुळे कर्ज परतफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विकास सेवा संस्थांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांनी राज्य सरकारकडे केली होती. अखेर शासनाने पीककर्ज परतफेडीची मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.-----------------------------जे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे बिले देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी व पीककर्ज परतफेडीस मुदत वाढ द्यावी. या मागणीसाठी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर ‘स्वाभीमानी’ने मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन कर्ज परतफेडीस मुदतवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे.- खासदार राजू शेट्टी----------------------------------------२०१३-१४चे राज्याचे पीक कर्जवाटप16,462 Cr.वाणिज्य बँका1,611 Cr.प्र्रादेशिक ग्रामीण बँका 13,354 Cr.राज्य बँक, जिल्हा बँक, भूविकास बँककेंद्राकडून दिले जाणारे पॅकेज येत्या चार-आठ दिवसांत कारखान्यांना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची खाते भागेल.