शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

पीककर्ज परतफेडीस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: June 30, 2015 03:42 IST

पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

मुंबई/ कोल्हापूर : पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळालेले नसल्याने जूनअखेर पीककर्जाची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याजसवलत योजनेपासून मुकावे लागणार होते. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी एक लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्यांना ० टक्के, तर तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला दोेन टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; पण ही रक्कम एक वर्षाच्या आत म्हणजे जूनअखेर परतफेड केली, तरच या योजनेचा लाभ त्यांना मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांची बिले वेळेत मिळत नसल्याने जूनअखेर कर्जाची परतफेड करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा तर उसाचे गाळप होऊन तीन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. राज्यातील ७० टक्के शेतकरी थकीत गेला आहे. परिणामी त्याला व्याजसवलतीला मुकावे लागणार होते. त्यामुळे कर्ज परतफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विकास सेवा संस्थांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांनी राज्य सरकारकडे केली होती. अखेर शासनाने पीककर्ज परतफेडीची मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.-----------------------------जे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे बिले देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी व पीककर्ज परतफेडीस मुदत वाढ द्यावी. या मागणीसाठी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर ‘स्वाभीमानी’ने मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन कर्ज परतफेडीस मुदतवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे.- खासदार राजू शेट्टी----------------------------------------२०१३-१४चे राज्याचे पीक कर्जवाटप16,462 Cr.वाणिज्य बँका1,611 Cr.प्र्रादेशिक ग्रामीण बँका 13,354 Cr.राज्य बँक, जिल्हा बँक, भूविकास बँककेंद्राकडून दिले जाणारे पॅकेज येत्या चार-आठ दिवसांत कारखान्यांना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची खाते भागेल.