शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

करोडोंचा खर्च अरबोंची वसुली

By admin | Updated: August 26, 2014 00:59 IST

उपराजधानीतील रस्त्यांना रुंद आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केवळ ३५० कोटी रुपये खर्च करून त्यामोबदल्यात अरबो

पेट्रोल-डिझेलवर सेस वसुली : हिशेब देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ नंदू पुरोहित/कमल शर्मा -नागपूरउपराजधानीतील रस्त्यांना रुंद आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केवळ ३५० कोटी रुपये खर्च करून त्यामोबदल्यात अरबो रुपयांची वसुली केली आहे. मात्र राज्य सरकार हे सांगायला तयार नाही की त्यांनी आजवर किती रुपये वसूल केले आहे. एमएसआरडीसी, नागपूर महापालिका आणि नासुप्रने मिळून शहरात ३५० कोटी रुपयांच्या आयआरडीपी योजना यशस्वी केली. यावर लागलेला खर्च राज्य सरकारने टोल वसुली आणि पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणाऱ्या सेसमधून वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. एक दशकापेक्षा जास्त काळापासून नागपूरकर टोल टॅक्स अदा करीत आहे. तसेच एक लिटर पेट्रोलवर २ टक्के आणि डिझेलवर १ टक्का सेससुद्धा भरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर लागणारा सेस पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट राज्य सरकारला देण्यात यावा, असे राज्य शासनाने निश्चित केले आहे. महापालिकेने याबाबत हिशेब मागितला तेव्हा आपल्याकडे याबाबत कुठलाच हिशेब नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. तज्ज्ञानुसार पेट्रोलवर प्रति लिटर १.६० रुपये आणि डिझेलवर ७० पैसे सेस वसूल केला जात आहे. शहरात दररोज सुमारे तीन लाख लिटर पेट्रोल आणि एक लाख लिटर डिझेल विकले जात आहे. त्यानुसार एका दिवसात सुमारे पाच लाख रुपये पेट्रोल विक्रीतूनच सेस वसूल केला जात आहे. वर्षाला १७ कोटी ७५ हजार रुपयापेक्षा अधिक आणि एक दशकाचा हिशेब लावला तर ही वसुली सुमारे १ अरब ७३ कोटी रुपयांपेक्षा अधिकही होते. राज्य सरकारला केवळ ३५० कोटी रुपये वसूल करायचे होते.म्हणजे अर्धी वसुली तर पेट्रोल विकूनच पूर्ण झाली आहे. डिझेल आणि जकातीद्वारे होत असलेली वसुली वेगळीच राहिली. आता खरी बाब तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा सरकार हिशेब देईल. खर्चावरही संशय आयआरडीपीअंतर्गत झालेल्या खर्चाबाबतही संशय आहे. महापालिकेनुसार एकूण योजना ३३०.४६ कोटी रुपयांची होती. यात ७२.६० कोटी रुपयांची कामे झाली नाही, म्हणजेच योजनेवर एकूण २५७.८६ कोटी रुपये खर्च झाले होते. दुसरीकडे टोल नाक्यांवर लागलेल्या बोर्डानुसार एमएसआरडीसीने दावा केला आहे की, रस्ते विकासावर आतापर्यंत ४३०.६० कोटी रुपये खर्च झाले आहे. तेव्हा खरे कोणाचे मानावे, हा खरा प्रश्न आहे.उत्तर देण्यास सरकारची टाळाटाळ सेस वसुलीसंबंधी राज्य सरकार मनपाला कुठलेही उत्तर द्यायला तयार नाही. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यानुसार, त्यांनी आपल्या कार्यकाळात नगरविकास मंत्रालयाला पत्र पाठवून आजवर किती सेस वसूल करण्यात आला आहे, याची माहिती मागितली होती. परंतु सरकारने त्याचे कुठलेही उत्तर दिले नाही. मनपाने यानंतरही अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र सरकारकडून कुठलेच उत्तर आले नाही.