शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

लक्ष्यपूर्तीसाठी ६०० कोटींची वसुली हवी, वसुली न झाल्यास संबंधित सहा. आयुक्तांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:49 AM

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे.

ठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे.विविध करांचा भरणा करण्यासाठी जनजागृती, नोटिसा बजावणे, मालमत्ता सील करणे, नळजोडणी खंडित करण्यासह विविध उपाय योजले जाऊ लागले आहेत. त्यानुसार, फेब्रुवारी २०१८ अखेर १७७५.८८ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ २१५.९५ कोटींनी अधिक आहे. परंतु, असे असले तरी दिलेले २४३९.४२ कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी आता अवघा एक महिन्याचा अवधी शिल्लक असून अद्यापही ६०० कोटींची वसुली शिल्लक असल्याने आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे.मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचे दिलेले उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित सहायक आयुक्त आणि त्या परिमंडळाचे उपायुक्त यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तसेच जे थकबाकीदार आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याबरोबरच त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत १५५९.९४ कोटींची वसुली झाली होती. यंदा त्याच कालावधीत १७७५.८८ कोटींची वसुली झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत २१५.९५ कोटींनी अधिक आहे. परंतु, अद्यापही निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा हे उत्पन्न तब्बल ६०० कोटींनी कमी आहे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी पालिका आयुक्तांनी उपरोक्त इशारा दिला आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ५०८ कोटींचे लक्ष्य दिले असताना या विभागाने फेब्रुवारीअखेरपर्यंत ३८८ कोटींची वसुली केली आहे.दुसरीकडे शहर विकास विभागानेदेखील मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३३.१० कोटींची वसुली कमी करून पिछाडी घेतली आहे. मागील वर्षी या विभागाने ४४५.४७ कोटींची वसुली केली होती.यंदा मात्र ती ४१२.३७ कोटींवर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २५.९५ कोटींची अधिक वसुली केली आहे. मागील वर्षी या विभागाने ५४.४३ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र ८०.३८ कोटींची वसुली केली आहे. दरम्यान, यंदा पाणीपुरवठ्याची वसुली मात्र काही अंशी का होईना वाढली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत या विभागाने ५.२७ कोटींची अधिकची वसुली केली असल्याने ही पाणीपुरवठा विभागासाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी या विभागाला अद्यापही ५४.४३ कोटींची वसुली करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यानुसार, थकबाकीदारांचे नळजोडण्या कापणे आदींसह इतर योजनांचा अवलंब केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी या विभागाने ६५.३० कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र ७०.५७ कोटीच वसूल केले.एकूणच ठाणे महापालिकेतील या महत्त्वाच्या विभागांसोबतच इतर विभागांनादेखील थकबाकी आणि वसुलीसाठी लक्ष्य देण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीनुसार पालिकेच्या तिजोरीत १७७५.८८ कोटींचे उत्पन्न आले आहे. मागील वर्षी ते १५५९.९४ कोटी एवढे होते.मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ २१५.९५ कोटींनी अधिक आहे. असे असले तरीदेखील एकूण दिलेल्या २४३९.४२ कोटींचे लक्ष्य पार करण्यासाठी अद्यापही ६०० कोटी वसूल होणे आवश्यक असून यासाठी एक महिन्याचाच अवधी शिल्लक राहिला आहे.१२० कोटींची वसुली अद्याप बाकीगेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराची वसूली सुमारे ६० कोटींनी अधिक असली तरीही लक्ष्य गाठण्यासाठी एका महिन्यात या विभागाला १२० कोटींची वसुली करायची आहे. तर, स्थानिक संस्थाकर बंद झाला आणि आता जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे या करापोटी येणाºया वसुलीत मात्र घट झाली आहे. स्थानिक संस्थाकरापोटी गेल्या वर्षी १५७.२५ कोटींची वसुली झाली होती. परंतु, यंदा मात्र केवळ ७१.०४ कोटीच वसूल झाले आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे