शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

खर्च वसूल झालेले ६२ टोल बंद

By admin | Updated: March 17, 2015 01:46 IST

देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरींची घोषणा : यापुढे सिमेंटचेच महामार्गनवी दिल्ली : ज्या रस्त्याच्या बांधकामासाठी १०० कोटींपेक्षा कमी खर्च झाला आहे व ज्यांचा खर्च टोलमधून वसूल झाला आहे, असे देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती देतानाच महामार्गांची गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी यापुढे सिमेंटचेच रस्ते बांधण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली.सिमेंट रस्त्यांमुळे खर्च वाढणार नसून, किमान १२० रुपये प्रति बॅग या दराने सिमेंट मिळणार असल्याने रस्त्यांची किंमत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर गडकरी यांनी त्यांच्या विभागाने सुरू केलेल्या नवीन वेब पोर्टलची माहिती दिली. जागतिक पातळीवरील नवे तंत्र रस्ते निर्माणासाठी वापरण्यात येईल, असे सांगून रस्त्यांची गुणवत्ता व त्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी सिमेंट रस्त्यांचा निर्णय घेतला आहे. देशातील ३६ सिमेंट कंपन्यांचे १०३ प्लांट आहेत. तेथून सिमेंट घेतले जाईल. त्यामुळे वाहतूक खर्चाचा बोजा व पर्यायाने किंमत कमी होईल. या पोर्टलवर आलेल्या निविदांनुसार किमान दर १२० रुपये प्रतिबॅग असून, कमाल दर १५७ रुपये ठरला आहे. राज्य सरकारे, महापालिका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी हा दर कायम आहे. आपल्या विभागाने यासाठी प्रथम पुढाकार घेतल्याने पायाभूत योजनांसाठी सिमेंट वापरण्यात येणार असल्याने यापुढे ३० टक्क्यांपर्यंत प्रकल्पांची किंमत कमी होईल. (विशेष प्रतिनिधी)राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, पीपीपी मॉडेलनुसार १०० कोटींपेक्षा कमी खर्च आलेले टोलनाके बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांवर यापुढे ई-टोल पद्धतही सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना बँकेत पैसे भरल्यानंतर एक स्टिकर देण्यात येईल. हे स्टिकर वाहनावर लावल्यानंतर त्यांना टोलनाक्यांवर थांबण्याची व टोल भरण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.