शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

"प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको; पंढरपूर कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचे CM फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:33 IST

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचा पुनर्विचार करा यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

Subramanian Swamy Pandharpur Corridor:पंढरपूर हे केवळ शहर नसून ते भूवैकुंठ आहे, तिथला प्राचीन वारसा नष्ट करून कॉरिडॉर उभारणे म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान आणि पैशांचा अपव्यय आहे, अशा कडक शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रस्तावित पंढरपूर मंदिर कॉरिडॉर प्रकल्पावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही काळापासून सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप करत आहेत. सरकारने हे पवित्र तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नये अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी सातत्याने करत आहेत.

प्राचीन मठ-मंदिरे पाडून विकास नको!

डॉ. स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर बनवण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. मात्र, यासाठी मंदिराच्या १०० मीटर परिघातील ७०० हून अधिक मालमत्ता, प्राचीन मठ, मंदिरे आणि घरे पाडण्याचे नियोजन आहे. हे पाऊल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा नष्ट करणारे ठरेल.

पत्रात काय म्हटलं?पंढरपुरात वारकरी अनेक पिढ्यांपासून ठराविक घरांमध्ये (मठ/वाडे) मुक्कामाला येतात. ही 'यजमान कृत्य' पद्धत मोडीत काढून तिथे शॉपिंग सेंटर्स किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणे हा विरोधाभास आहे, असं स्वामींनी म्हटलं. तीर्थक्षेत्रातील मोकळ्या जागांवर आणि वारकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनींवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्याऐवजी सरकार जुनी आणि कायदेशीर बांधकामे पाडत असल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.

पंढरपुरात आधीच १००० हून अधिक मठ आणि धर्मशाळा आहेत. तसेच मंदिर समितीचे स्वतःचे यात्री निवास आहेत. त्यामुळे नवीन यात्री निवास बांधण्यासाठी ऐतिहासिक वास्तू पाडण्याची गरज नाही. स्वामींनी पत्रात नमूद केले की, पंढरपुरात देशातील सर्वाधिक सुलभ संकुल आहेत, परंतु त्यांची देखभाल नीट होत नाही. नवीन कॉरिडॉर बांधण्यापेक्षा आहे त्या सुविधांची दुरुस्ती करणे अधिक हिताचे ठरेल.

चंद्रभागेच्या पलीकडे कॉरिडॉर उभारावा

डॉ. स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे की, जर कॉरिडॉर उभारायचाच असेल, तर तो चंद्रभागा नदीच्या पलीकडच्या तीरावर जिथे मोकळी जागा उपलब्ध आहे, तिथे उभारावा. यामुळे शहराचा विस्तार होईल आणि जुन्या पंढरपूरचा ऐतिहासिक वारसाही जपला जाईल.

वारकरी संप्रदायाचा आवाज

"वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरची माती ही पवित्र आहे. येथील प्राचीन वास्तू पाडून भजन-कीर्तनासाठी नवीन मंडप उभारणे हास्यास्पद आहे, कारण भक्ती संकीर्तन सभागृह आधीच अस्तित्वात आहे. मला आशा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाविक आणि वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकल्पाचा पुनर्विचार करतील आणि ऐतिहासिक वारसा जतन करणारा पर्यायी मार्ग काढतील," असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Swamy opposes Pandharpur corridor, says don't destroy ancient heritage.

Web Summary : Subramanian Swamy opposes the Pandharpur corridor project, urging CM Fadnavis to reconsider. He argues it destroys the ancient heritage and hurts the Warkari community. Swamy suggests building the corridor across the Chandrabhaga river to preserve old structures and avoid disrupting existing pilgrim facilities.
टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीPandharpurपंढरपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस